शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
3
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
4
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
5
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
6
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
7
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
8
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
9
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
10
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
11
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
12
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
13
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
14
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
15
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
16
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
17
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
18
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
20
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?

‘दुष्काळी गाव’ कागदावरच

By admin | Updated: December 28, 2015 00:45 IST

कोरेगाव उत्तर : सुविधांपासून अनेक गावे आजही वंचित; योजनेत समावेश करण्याची मागणी

वाठार स्टेशन : शासनाने जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश दुष्काळी गाव म्हणून जाहीर केला. यामध्ये कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला; मात्र दुष्काळी गाव म्हणून ज्या सुविधा मिळणे अपेक्षित होत्या, त्या सुविधांपासून आजही अनेक गावे वंचितच राहिल्याने शासनाची ‘दुष्काळी गाव’ योजना केवळ कागदावरच राहिली आहे.चालूवर्षी राज्यात अनेक भागांत पावसाने दिलासा दिला असला तरी कोरेगाव तालुक्यात मात्र आत्तापासूनच दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या आहेत. तालुक्याच्या उत्तर भागातील जवळपास २६ गावांमध्ये आत्तापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. गावोगावच्या विहिरी, पाझर तलाव, कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे.पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे काही दिवसांतच अनेक गावांना टँकर सुरू करावे लागणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील दुष्काळ मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. यासाठी आत्तापासूनच दुष्काळ निवारणाचे प्रयत्न होणे गरजेचे आहेत.शासनाने काही दिवसांपूर्वीच दुष्काळी गावांची यादी जाहीर करून जनतेला दिलासा देण्याचे काम केले. या भागातील अनेक गावांचा समावेशही यामध्ये झाला; परंतु याच भागातील देऊर, अंबवडे (सं) वाघोली, बनवडी, अरबवाडी सारख्या गावांमध्ये दुष्काळ असूनही या गावांचा समावेश दुष्काळी गावाच्या यादीत झाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत असून या गावांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी होत आहे. ज्या गावांचा समावेश दुष्काळी गाव म्हणून झाला, त्या गावाला मात्र अद्याप दुष्काळी सुविधा मिळाल्या नाहीत. या उलट बँका, पतसंस्थाकडून वेगाने वसुलीचा धडाका सुरू झाला, तर महावितरणकडूनही वीजबिलाबाबत कोणतीही सुविधा या भागातील शेतकऱ्यांना मिळाली नाही. यामुळे या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.सद्य:स्थितीत वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील देऊर परिसरात काही दिवस पाणी सोडल्याने गावाच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे. मात्र, या पाण्यामुळे देऊरकरांची पाणी समस्या सुटलेली नाही. शासनाने या भागातील दुष्काळासाठी आत्तापासूनच काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. (वार्ताहर)पाझर तलावही कोरडे..तालुक्यातील वाठार स्टेशन, पिंपोडे बु, वाघोली, सोनके, करंजखोप, रणदुल्लाबाद, चवणेश्वर, नांदवळ, नायगाव, सोळशी, आसनगाव, चौधरवाडी, विखळे, तडवळे, तळिये, बिचुकले, देऊर, राऊतवाडी, दहिगाव या गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे या गावांतील पाझर तलाव कोरडे पडले आहेत. यामुळे या भागातील हक्काचा आर्थिक देणारा ऊस आता गायब झाला आहे, तर असणारी पीक परिस्थिती वाचविण्यासाठी शेतकरी तारेवरची कसरतच करत आहे.ज्या गावांचा समावेश दुष्काळी गाव म्हणून करण्यात आल्या त्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लाईटबिल, विद्यार्थी प्रवेश शुल्क माफी तसेच कर्जाबाबत शिथिलता आणून या उर्वरित गावांचा फेरसर्व्हे करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.