शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दुष्काळी माण झाला टँकरमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:37 IST

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात गेेल्या वर्षापासून समाधानकारक पाऊस झाला असून, अद्यापही सर्वच पाणवठे ओलेचिंब आहेत, तर काही काठोकाठ पाण्याने ...

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात गेेल्या वर्षापासून समाधानकारक पाऊस झाला असून, अद्यापही सर्वच पाणवठे ओलेचिंब आहेत, तर काही काठोकाठ पाण्याने भरलेले असल्याने, निम्मा मार्च महिना संपला तरी एकाही गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचा प्रस्ताव शासनदरबारी दाखल झाला नसल्याने, यंदाचा उन्हाळा माणवासीयांना सुसह्य जाणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने राज्यातील तब्बल साडेअकरा हजार गावांमध्ये जाणवणारी पाणीटंचाई, गतवर्षापासून पर्जन्यमान वाढू लागल्याने कमी होत चालल्याचे दिसून येत असतानाच, कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील काही गावे व वाडी-वस्त्यांवर गेल्या वर्षापर्यंत रात्रं-दिवस टँकरची घरघर सुरू होती. मात्र, गेेल्या वर्षापासून चांगल्याप्रकारे झालेल्या पावसामुळे यंदाच्या उन्हाळ्यात मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत पाण्याची कमतरता तालुक्यात कोठेही जाणवली नसल्याने शासनाचाही दररोजचा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे.

ग्रामसमृद्धीसाठी असलेल्या शासकीय योजना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने योग्यप्रकारे राबविल्या तर काय बदल घडून येऊ शकतो, हे माण तालुक्यातील जलसंधारणाच्या झालेल्या कामांवरून दिसून येते. गावोगावच्या शिवारात पानी फाैंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनी गट, तट, पक्ष-पार्टी बाजूला ठेवून एकजुटीने केलेल्या कामाचं चांगलं फलित सध्या पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी गावा-गावात असलेली भीषण पाणीटंचाई, तहान भागविण्यासाठी रात्रं-दिवस टँकरने होणारा पाणीपुरवठा आता बंद होऊन, माण तालुका सध्या टंचाई व टँकरमुक्त झाला आहे.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गावोगावची पाणी समस्या कायमची निकाली काढण्यासाठी तलाव, ओढे-नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्यासाठी जी जलसंधारणाची कामे झाली होती. त्यात गेेल्या दोन वर्षांत पडलेल्या पावसाने संपूर्ण कामे उपयोगात आली, तर टेंभू, उरमोडी आणि तारळी उपसा योजनेतून दोनवेळा माण तालुक्यातील पिंगळी, ढाकणी, गंगोती, लोधवडेसह महाबळेश्वरवाडीचा तलाव भरून निघाल्यामुळे गावाच्या ओढ्यावरील साखळी बंधारे, नालाबांध, विहिरी, ओढ्या-नाल्यात अद्यापपर्यंत चांगले पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आणि विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावली. त्याचा फायदा होऊन, यंदा कायम दुष्काळी माण तालुका टँकरमुक्त झालेला दिसून येत आहे.

कोट :

गेल्या तीन वर्षांपासून माण तालुक्यातील गावोगावी पाण्यासाठी लोकसहभागातून झालेली जलसंधारणाची कामे महत्त्वाची ठरली आहेत. समतल चर, सीसीटी, बंधाऱ्यांंचे खोलीकरण, ओढ्या-नाल्यांंचे रुंदीकरण ही महत्त्वाची कामे करण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून केलेले श्रमदान महत्त्वाचे ठरले. त्याचेच फलित म्हणून आजमितीला माण तालुका टँकरमुक्त झाल्याचा आनंद होत आहे. नागरिकांनी वृक्षलागवड करून पर्यावरणपूरक वातावरण टिकवले पाहिजे.

- डॉ. नितीन वाघमोडे, आयकर आयुक्त

१८ढाकणी

फोटो : ढाकणी येथील तलावातून माण तालुक्याला टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. सध्या या ठिकाणी पाणीच पाणी आहे.