शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

माण, खटावसह सातारा जिल्ह्यात दुष्काळी ‘ढग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:39 IST

नितीन काळेल । सातारा : जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व ...

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगावसह इतर तालुक्यांत सद्य:स्थितीत दुष्काळी ‘ढग’ दाटून आले आहेत. आगामी काळात तर जिल्ह्यातील इतर भागातही भीषण स्थिती निर्माण होणार आहे. सध्या पूर्व भागात रब्बीची पेरणी आणि जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील १५ गावे आणि ५५ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये आगामी काळात आणखी वाढ होणार आहे.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. पेरणीनंतर पूर्व भागातील माण तालुक्यात पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे हाती फारसे उत्पन्न आले नाही. पाऊस नसल्याने लहानांसह मोठ्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. तर माणमध्ये आत्तापर्यंत २२४ मिलीमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ५५ टक्के आहे. खटाव तालुक्यात आतापर्यंत ४३९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.या तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी काही भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. फलटण तालुक्यात ६१ टक्के पाऊस झालाअसला तरी कालवे असल्याने लोकांना टंचाईची फारसी समस्या उद्भवणारनाही. मात्र, काही भागात जनावरांचाचारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच कोरेगाव तालुक्यात ३९६ मिलीमीटर पाऊस पडला असून, टक्केवारी ६६ इतकी आहे. कोरेगाव तालुक्यातही पाण्याचे संकट निर्माण होणार आहे. सध्या कोरेगाव तालुक्यात एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.पूर्व भागात अशी स्थिती असताना पश्चिमकडे सतत अडीच महिने पाऊस होता. त्यामुळे कोयनेसह धोम, उरमोडी, कण्हेर, बलकवडी, तारळी धरणे यावर्षी वेळेपूर्वी भरली. कोयनेतून सध्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. चिंतेची बाब म्हणजे कोयनेत सध्या ९४ टीएमसीपर्यंत साठा आहे. सातारा तालुक्यातही १०८ टक्के पाऊस झाला आहे. कºहाडमध्ये १०२, जावळी ९६, खंडाळा ९३, वाई तालुक्यात ७७ टक्के पाऊस आत्तापर्यंत झाला आहे. महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत ५६९१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.माण, खटाव तालुक्यांत पावसाअभावी खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक गावांत तर पेरणीसाठी झालेलाखर्चही निघाला नाही. त्यातच आॅक्टोबरपासून दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने रब्बीच्या पेरणीचेसंकट कायम आहे. पूर्व भागात यंदा प्रथमच रब्बी हंगामातील क्षेत्रमोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पिण्याला पाणी नाही तेथे पीकघेऊन काय फायदा या विवंचनेत शेतकरी आहेत.कोयनेला ५ तर नवजाला ६ हजार मिलीमीटरमाण, खटाव या दुष्काळी तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी ४०० ते ४५० मिलीमीटर आहे. माण तालुक्यात यंदा निम्माच पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे महाबळेश्वर येथे ५६९१, कोयनेला ५५०० तर सर्वाधिक नवजा येथे ६००० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. पावसाची पूर्व आणि पश्चिम भागातील ही तफावत बरेच काही सांगून जाणारी आहे.खासगी टँकरसह ग्रामपंचायतीवर भरपाण्याअभावी अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तर काही ठिकाणी खासगी टँकरमधून विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहेत. तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.