शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

माण, खटावसह सातारा जिल्ह्यात दुष्काळी ‘ढग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:39 IST

नितीन काळेल । सातारा : जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व ...

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगावसह इतर तालुक्यांत सद्य:स्थितीत दुष्काळी ‘ढग’ दाटून आले आहेत. आगामी काळात तर जिल्ह्यातील इतर भागातही भीषण स्थिती निर्माण होणार आहे. सध्या पूर्व भागात रब्बीची पेरणी आणि जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.दरम्यान, जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील १५ गावे आणि ५५ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये आगामी काळात आणखी वाढ होणार आहे.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. पेरणीनंतर पूर्व भागातील माण तालुक्यात पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे हाती फारसे उत्पन्न आले नाही. पाऊस नसल्याने लहानांसह मोठ्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. तर माणमध्ये आत्तापर्यंत २२४ मिलीमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ५५ टक्के आहे. खटाव तालुक्यात आतापर्यंत ४३९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.या तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी काही भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. फलटण तालुक्यात ६१ टक्के पाऊस झालाअसला तरी कालवे असल्याने लोकांना टंचाईची फारसी समस्या उद्भवणारनाही. मात्र, काही भागात जनावरांचाचारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच कोरेगाव तालुक्यात ३९६ मिलीमीटर पाऊस पडला असून, टक्केवारी ६६ इतकी आहे. कोरेगाव तालुक्यातही पाण्याचे संकट निर्माण होणार आहे. सध्या कोरेगाव तालुक्यात एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.पूर्व भागात अशी स्थिती असताना पश्चिमकडे सतत अडीच महिने पाऊस होता. त्यामुळे कोयनेसह धोम, उरमोडी, कण्हेर, बलकवडी, तारळी धरणे यावर्षी वेळेपूर्वी भरली. कोयनेतून सध्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. चिंतेची बाब म्हणजे कोयनेत सध्या ९४ टीएमसीपर्यंत साठा आहे. सातारा तालुक्यातही १०८ टक्के पाऊस झाला आहे. कºहाडमध्ये १०२, जावळी ९६, खंडाळा ९३, वाई तालुक्यात ७७ टक्के पाऊस आत्तापर्यंत झाला आहे. महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत ५६९१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.माण, खटाव तालुक्यांत पावसाअभावी खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक गावांत तर पेरणीसाठी झालेलाखर्चही निघाला नाही. त्यातच आॅक्टोबरपासून दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने रब्बीच्या पेरणीचेसंकट कायम आहे. पूर्व भागात यंदा प्रथमच रब्बी हंगामातील क्षेत्रमोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पिण्याला पाणी नाही तेथे पीकघेऊन काय फायदा या विवंचनेत शेतकरी आहेत.कोयनेला ५ तर नवजाला ६ हजार मिलीमीटरमाण, खटाव या दुष्काळी तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी ४०० ते ४५० मिलीमीटर आहे. माण तालुक्यात यंदा निम्माच पाऊस झाला आहे. तर दुसरीकडे महाबळेश्वर येथे ५६९१, कोयनेला ५५०० तर सर्वाधिक नवजा येथे ६००० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. पावसाची पूर्व आणि पश्चिम भागातील ही तफावत बरेच काही सांगून जाणारी आहे.खासगी टँकरसह ग्रामपंचायतीवर भरपाण्याअभावी अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तर काही ठिकाणी खासगी टँकरमधून विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहेत. तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.