शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

जिल्ह्यात भीषण दुष्काळ !

By admin | Updated: September 4, 2015 00:14 IST

तलाव कोरडे : फलटण तालुक्यात २४ टक्के पाऊ स; राज्यकर्त्यांची मात्र पाठ

सातारा : मराठवाड्यात झाला आहे, तेवढाच किंबहुना कमी पाऊस यंदा सातारा जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे मराठवाड्याइतकेच भीषण दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर पसरले आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर तालुका वगळता इतर तालुक्यांत अगदी तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्मळून पडली आहेत. दुष्काळी भागातील तलाव कोरडे पडले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला असल्याने माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतराची वेळ आली आहे. याकडे राज्यकर्त्यांनी पाठ फिरविली आहे.माण, खटाव तालुक्यांत सध्या प्रचंड पाणीटंचाई झाली आहे. नाले, ओढे कोरेड पडले असून, पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीइतकाही पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने बांधावर, माळरानावर गवतच उगवले नसल्याने चाराटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. फलटण तालुक्यात सर्वांत कमी ९४.६ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात पावसाची सरासरी ३८२ मि.मी. इतकी आहे. सरासरीच्या केवळ २४ टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. त्याखालोखाल कोरेगाव तालुक्यात १८०.४ मि.मी. म्हणजे सरासरीच्या २८ टक्के पाऊस झाला आहे. फलटण तालुक्यात तीव्र दुष्काळ जाणवत आहे. मात्र, फलटण तालुका कृषी अधिकारी यांनी टंचाई आढावा बैठकीत तालुक्यात चारा उपलब्ध असल्याचा अहवाल दिल्यामुळे चारा छावणी मिळण्याची आशा मावळली आहे. सध्या फलटण तालुक्यातील १४ गावांनी चारा मागणीसाठीचे निवेदन तहसील विभागाकडे दिले असून, ७ गावे व ७९ वाड्या-वस्त्यांवरील १२ हजार ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.माण तालुक्यातील ४१ हजार १७, खटाव तालुक्यातील ४८ हजार ९७४, फलटण तालुक्यातील १६ हजार ४५९, कोरेगाव तालुक्यातील २८ हजार ४७५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्णपणे वाया जाणार असल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पावसाने अशीच पाठ फिरविली तर भविष्यामध्ये प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)कऱ्हाड तालुकाही कोरडा!पाऊसमानाचा तालुका म्हणून कऱ्हाड तालुक्याची ख्याती असली तरीही या तालुक्यात सरासरीच्या अवघा ३० टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली असली तरीही पुढील उन्हाळ्यात पाण्याच्या या तालुक्यालाही चटके सोसावे लागण्याची चिन्हे यानिमित्ताने दिसत आहेत.पावसाची पाच वर्षांतील तुलनात्मक आकडेवारीतालुकासरासरी २०१०२०११२०१२२०१३२०१४२०१५टक्केवारीसातारा९०८१०११ ७७७.६ ६८६११८२१०३४४०७४५%जावळी१६०३१५३०१७३७१२५८.८१७८७१६३८९६०६०%कोरेगाव६४२.६९०४४९७३६०५९६४७०१८०२८%कऱ्हाड६३२.१८७२५९३ ५५०५६९६६३१९५३०%पाटण१७३३१५१११८०४१५७४१५१० १५२५६६९३९%फलटण३८२ १०२८३४२२६७४६९४०७३८३ २४%माण४४२७६१२२५२६९४०७३८३१३५३३%खटाव४१५८१४३७३२७३५७४५५२१३५३२%वाई ७१०.३१९२९८७३६५० ८८१६७४२४३.३३४%महाबळेश्वर२२२३४२४४६४५६३९०८३८१२५६५०३०४३ १३७%खंडाळा४१६६६२४३३४५१६३३४८५४५११९५.२ %चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी धोक्यात खरीप हंगामातील पिकांना गरजेइतकाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावीरल पेरणी धोक्यात आली आहे. पश्चिम भागात उपलब्ध पाणीस्रोतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिके जगविली असली, तरी अपेक्षित उत्पादन होणार नाही. पूर्व भागातील पिके पावसाअभावी उन्मळून पडली आहेत.रब्बी हंगामही येणार अडचणीतखरीप हंगामच वाया जाण्याची चिन्हे असताना रब्बी हंगामातील पेरणी कशी होणार? याबाबत प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांपुढे आहे. गहू, ज्वारीची पिकेही कशी करायची याचे कोडे आहे. त्यातच बागायत पिकांचे तर स्वप्नच ठरणार आहे.