शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भीषण दुष्काळ !

By admin | Updated: September 4, 2015 00:14 IST

तलाव कोरडे : फलटण तालुक्यात २४ टक्के पाऊ स; राज्यकर्त्यांची मात्र पाठ

सातारा : मराठवाड्यात झाला आहे, तेवढाच किंबहुना कमी पाऊस यंदा सातारा जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे मराठवाड्याइतकेच भीषण दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर पसरले आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर तालुका वगळता इतर तालुक्यांत अगदी तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्मळून पडली आहेत. दुष्काळी भागातील तलाव कोरडे पडले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला असल्याने माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतराची वेळ आली आहे. याकडे राज्यकर्त्यांनी पाठ फिरविली आहे.माण, खटाव तालुक्यांत सध्या प्रचंड पाणीटंचाई झाली आहे. नाले, ओढे कोरेड पडले असून, पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीइतकाही पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने बांधावर, माळरानावर गवतच उगवले नसल्याने चाराटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. फलटण तालुक्यात सर्वांत कमी ९४.६ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात पावसाची सरासरी ३८२ मि.मी. इतकी आहे. सरासरीच्या केवळ २४ टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. त्याखालोखाल कोरेगाव तालुक्यात १८०.४ मि.मी. म्हणजे सरासरीच्या २८ टक्के पाऊस झाला आहे. फलटण तालुक्यात तीव्र दुष्काळ जाणवत आहे. मात्र, फलटण तालुका कृषी अधिकारी यांनी टंचाई आढावा बैठकीत तालुक्यात चारा उपलब्ध असल्याचा अहवाल दिल्यामुळे चारा छावणी मिळण्याची आशा मावळली आहे. सध्या फलटण तालुक्यातील १४ गावांनी चारा मागणीसाठीचे निवेदन तहसील विभागाकडे दिले असून, ७ गावे व ७९ वाड्या-वस्त्यांवरील १२ हजार ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.माण तालुक्यातील ४१ हजार १७, खटाव तालुक्यातील ४८ हजार ९७४, फलटण तालुक्यातील १६ हजार ४५९, कोरेगाव तालुक्यातील २८ हजार ४७५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्णपणे वाया जाणार असल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पावसाने अशीच पाठ फिरविली तर भविष्यामध्ये प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)कऱ्हाड तालुकाही कोरडा!पाऊसमानाचा तालुका म्हणून कऱ्हाड तालुक्याची ख्याती असली तरीही या तालुक्यात सरासरीच्या अवघा ३० टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली असली तरीही पुढील उन्हाळ्यात पाण्याच्या या तालुक्यालाही चटके सोसावे लागण्याची चिन्हे यानिमित्ताने दिसत आहेत.पावसाची पाच वर्षांतील तुलनात्मक आकडेवारीतालुकासरासरी २०१०२०११२०१२२०१३२०१४२०१५टक्केवारीसातारा९०८१०११ ७७७.६ ६८६११८२१०३४४०७४५%जावळी१६०३१५३०१७३७१२५८.८१७८७१६३८९६०६०%कोरेगाव६४२.६९०४४९७३६०५९६४७०१८०२८%कऱ्हाड६३२.१८७२५९३ ५५०५६९६६३१९५३०%पाटण१७३३१५१११८०४१५७४१५१० १५२५६६९३९%फलटण३८२ १०२८३४२२६७४६९४०७३८३ २४%माण४४२७६१२२५२६९४०७३८३१३५३३%खटाव४१५८१४३७३२७३५७४५५२१३५३२%वाई ७१०.३१९२९८७३६५० ८८१६७४२४३.३३४%महाबळेश्वर२२२३४२४४६४५६३९०८३८१२५६५०३०४३ १३७%खंडाळा४१६६६२४३३४५१६३३४८५४५११९५.२ %चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी धोक्यात खरीप हंगामातील पिकांना गरजेइतकाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावीरल पेरणी धोक्यात आली आहे. पश्चिम भागात उपलब्ध पाणीस्रोतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिके जगविली असली, तरी अपेक्षित उत्पादन होणार नाही. पूर्व भागातील पिके पावसाअभावी उन्मळून पडली आहेत.रब्बी हंगामही येणार अडचणीतखरीप हंगामच वाया जाण्याची चिन्हे असताना रब्बी हंगामातील पेरणी कशी होणार? याबाबत प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांपुढे आहे. गहू, ज्वारीची पिकेही कशी करायची याचे कोडे आहे. त्यातच बागायत पिकांचे तर स्वप्नच ठरणार आहे.