शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

फलटणमध्ये डीपी चोर बिनधास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

आदर्की : सातत्याने डीपी चोरीला जाणे व नादुरुस्त होण्याच्या घटनांमुळे संपूर्ण फलटण तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच चोरीला ...

आदर्की : सातत्याने डीपी चोरीला जाणे व नादुरुस्त होण्याच्या घटनांमुळे संपूर्ण फलटण तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच चोरीला गेलेल्या डीपी सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. फलटण तालुका शिवसेनाप्रमुख प्रदीप झणझणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, आतापर्यंत २०१७-१८ मध्ये १७ डीपी चोरीला गेल्या आहेत. २०१८-१९मध्ये ४३ डीपी, २०१९-२० मध्ये ७१, तर २०२०-२१ मध्ये ५९ डीपी चोरीला गेल्या आहेत. एकंदरीत मागील चार वर्षांपासून एकूण १९० डीपी चोरीला गेलेल्या असून, डीपी चोरीचा चढता आलेख आहे. प्रत्येक डीपी चोरीला गेल्यानंतर फलटण वीज महावितरणने फलटण पोलिसांकडे त्यासंबंधी गुन्हे दाखल केले आहेत. परंतु आजतागायत एकही डीपी चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेले नाही. फलटण तालुक्यासाठी ही अत्यंत दुर्दैवी व नामुष्कीजनक बाब असून, लवकर या समस्या निकाली काढण्यात याव्यात. असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डीपी चोरीला गेली अथवा नादुरुस्त झाली की वीज महावितरणकडे नवीन किंवा दुरुस्त डीपी शिल्लक नसल्यामुळे डीपी बसवण्यासाठी नेहमी दिरंगाई होत असल्याचे फलटण वीज महावितरणचे अधिकारी सांगत असतात तसेच अगोदर बिल भरा, मगच डीपी मिळेल, अशी हुकूमशाही पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे डीपी बसविण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे कोट्यवधी रुपयांचे सातत्याने नुकसान होत आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिवाला पिकांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा कायम घोर लागलेला असतो. याकडे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष घालावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन हाती घेतील व त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

चौकट..

शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

शेतकऱ्यांनी वीज महावितरणकडून डिपाॅझिट भरून सर्व अटी व शर्थी पूर्ण करून रितसर वीज कनेक्शन घेतल्यानंतर डीपी चोरीला गेली अथवा नादुरुस्त झाली की दोन दिवसांत डीपी बसवून वीजपुरवठा पूर्ववत करून देणे हे वीज महावितरणचे कर्तव्य आहे. डीपी बसवण्यासाठी वीज महावितरणने शेतकऱ्यांकडे कोणतीही मागणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणत्याही मागण्या, अटी व शर्तींशिवाय डीपी बसवून देणे वीज महावितरणला बंधनकारक असतानाही महावितरणच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या लक्षात आणून दिले.