शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये डीपी चोर बिनधास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

आदर्की : सातत्याने डीपी चोरीला जाणे व नादुरुस्त होण्याच्या घटनांमुळे संपूर्ण फलटण तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच चोरीला ...

आदर्की : सातत्याने डीपी चोरीला जाणे व नादुरुस्त होण्याच्या घटनांमुळे संपूर्ण फलटण तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच चोरीला गेलेल्या डीपी सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. फलटण तालुका शिवसेनाप्रमुख प्रदीप झणझणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, आतापर्यंत २०१७-१८ मध्ये १७ डीपी चोरीला गेल्या आहेत. २०१८-१९मध्ये ४३ डीपी, २०१९-२० मध्ये ७१, तर २०२०-२१ मध्ये ५९ डीपी चोरीला गेल्या आहेत. एकंदरीत मागील चार वर्षांपासून एकूण १९० डीपी चोरीला गेलेल्या असून, डीपी चोरीचा चढता आलेख आहे. प्रत्येक डीपी चोरीला गेल्यानंतर फलटण वीज महावितरणने फलटण पोलिसांकडे त्यासंबंधी गुन्हे दाखल केले आहेत. परंतु आजतागायत एकही डीपी चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेले नाही. फलटण तालुक्यासाठी ही अत्यंत दुर्दैवी व नामुष्कीजनक बाब असून, लवकर या समस्या निकाली काढण्यात याव्यात. असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डीपी चोरीला गेली अथवा नादुरुस्त झाली की वीज महावितरणकडे नवीन किंवा दुरुस्त डीपी शिल्लक नसल्यामुळे डीपी बसवण्यासाठी नेहमी दिरंगाई होत असल्याचे फलटण वीज महावितरणचे अधिकारी सांगत असतात तसेच अगोदर बिल भरा, मगच डीपी मिळेल, अशी हुकूमशाही पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे डीपी बसविण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे कोट्यवधी रुपयांचे सातत्याने नुकसान होत आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिवाला पिकांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा कायम घोर लागलेला असतो. याकडे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष घालावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन हाती घेतील व त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

चौकट..

शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

शेतकऱ्यांनी वीज महावितरणकडून डिपाॅझिट भरून सर्व अटी व शर्थी पूर्ण करून रितसर वीज कनेक्शन घेतल्यानंतर डीपी चोरीला गेली अथवा नादुरुस्त झाली की दोन दिवसांत डीपी बसवून वीजपुरवठा पूर्ववत करून देणे हे वीज महावितरणचे कर्तव्य आहे. डीपी बसवण्यासाठी वीज महावितरणने शेतकऱ्यांकडे कोणतीही मागणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणत्याही मागण्या, अटी व शर्तींशिवाय डीपी बसवून देणे वीज महावितरणला बंधनकारक असतानाही महावितरणच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या लक्षात आणून दिले.