शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कंपनी उत्पादन नको, माणसांचे जीव वाचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

खंडाळा : कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश लागू केले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना संसर्गावर आळा घालणे सोयीस्कर ...

खंडाळा : कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश लागू केले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना संसर्गावर आळा घालणे सोयीस्कर ठरणार आहे. मात्र, खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून अनेक रुग्ण आढळले आहेत. याच कंपन्यांच्या अनिर्बंधतेमुळे खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील कंपन्या बंद ठेवल्या तर कोरोनाचा विळखा सुटू शकतो. याबाबत तालुक्यातील जनतेने उठाव करूनही प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे सर्वस्वी अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार सार्वत्रिक ठिकाणी एकत्र न येण्याचे आदेश दिले असल्याने सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. मात्र, अनेक कंपनीतील कामगार पॉझिटिव्ह होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात रुग्णसंख्या एवढ्या पटीत वाढण्याचे कारण तालुक्यातील औद्योगिक वसाहत असल्याचे लोकांचे मत आहे. वास्तविक, खंडाळा तालुका पुण्यापासून जवळ आहे. तसेच तालुक्यातील शेकडो कंपनीत हजारो कामगार विदेशी आहेत. त्यामध्ये पुण्याहून येणारा कर्मचारी वर्ग मोठा आहे. तसेच गावोगावचे शेकडो तरुण या कंपन्यांमधून काम करतात. कंपनीतील कामगार एकमेकांच्या संपर्कात आल्याने जंतूसंसर्ग पसरतो आहे. अनेक कंपन्यांमध्ये सध्या रुग्ण आढळले आहेत. तेथे नियमाप्रमाणे त्यांची काळजी घेतली जात नाही. तरीही प्रशासनाकडून त्या बंद ठेवण्यात आल्या नाहीत. कंपनी प्रशासन उलट उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कामगारांवर दबाव आणत असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे कंपन्या सुरू ठेवण्याचा खेळ स्थानिक लोकांच्या अंगलट येत आहे.

चौकट..

वणवा भडकवू देऊ नका!

खंडाळा तालुक्यातील कंपन्यात पुण्याकडील कामगार वर्ग दररोज ये-जा करीत आहे. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यांच्या आरोग्याबाबत कंपनी प्रशासन विशेष खबरदारी घेत नाही. त्याचाच परिपाक रुग्णवाढीत होत आहे. त्यामुळे तालुक्याचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. कोरोनाचा वणवा आणखी भडकू नये आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी कंपन्यातील कामगारांची राहण्याची व्यवस्था स्वतंत्र करावी किंवा कंपन्या तूर्तास बंदच ठेवाव्यात, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

(चौकट..)

तालुका टास्क फोर्स गरजेचा...

कोरोनाला आळा घालण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करायला हवे. प्रशासनाच्या मदतीला पदाधिकारी धावले तरच हे शक्य आहे. गावोगावच्या लोकांनी उपचारासाठी बेड मिळावेत म्हणून कोणाकडे धाव घ्यावी. मुळातच या कामात अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा समन्वय गरजेचा आहे. पण सध्यातरी तो दिसत नाही. यासाठी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांनी तालुका टास्क फोर्स उभारणे आवश्यक आहे.

कोट..

सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत खंडाळ्यात आहे. यामधील मेडिकल प्रोडक्ट कंपन्या सोडल्या तर कामगारांच्या आरोग्याची काळजी इतर कंपन्यांमधून घेतली जात नाही. त्यामुळे सर्व कंपन्या सुरू असल्याने गावोगावचे कामगार लोक एकमेकांच्या सहवासात येत आहेत. खंडाळा तालुक्यात कोरोना विस्ताराचे मूळ कंपन्यांत बाहेरून येणारे कामगार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या मुळावर घाव घालण्यासाठी काही दिवस कंपन्या बंद ठेवाव्यात.

-नितीन भरगुडे पाटील, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा