शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कंपनी उत्पादन नको, माणसांचे जीव वाचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

खंडाळा : कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश लागू केले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना संसर्गावर आळा घालणे सोयीस्कर ...

खंडाळा : कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश लागू केले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना संसर्गावर आळा घालणे सोयीस्कर ठरणार आहे. मात्र, खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून अनेक रुग्ण आढळले आहेत. याच कंपन्यांच्या अनिर्बंधतेमुळे खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील कंपन्या बंद ठेवल्या तर कोरोनाचा विळखा सुटू शकतो. याबाबत तालुक्यातील जनतेने उठाव करूनही प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे सर्वस्वी अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार सार्वत्रिक ठिकाणी एकत्र न येण्याचे आदेश दिले असल्याने सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. मात्र, अनेक कंपनीतील कामगार पॉझिटिव्ह होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात रुग्णसंख्या एवढ्या पटीत वाढण्याचे कारण तालुक्यातील औद्योगिक वसाहत असल्याचे लोकांचे मत आहे. वास्तविक, खंडाळा तालुका पुण्यापासून जवळ आहे. तसेच तालुक्यातील शेकडो कंपनीत हजारो कामगार विदेशी आहेत. त्यामध्ये पुण्याहून येणारा कर्मचारी वर्ग मोठा आहे. तसेच गावोगावचे शेकडो तरुण या कंपन्यांमधून काम करतात. कंपनीतील कामगार एकमेकांच्या संपर्कात आल्याने जंतूसंसर्ग पसरतो आहे. अनेक कंपन्यांमध्ये सध्या रुग्ण आढळले आहेत. तेथे नियमाप्रमाणे त्यांची काळजी घेतली जात नाही. तरीही प्रशासनाकडून त्या बंद ठेवण्यात आल्या नाहीत. कंपनी प्रशासन उलट उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कामगारांवर दबाव आणत असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे कंपन्या सुरू ठेवण्याचा खेळ स्थानिक लोकांच्या अंगलट येत आहे.

चौकट..

वणवा भडकवू देऊ नका!

खंडाळा तालुक्यातील कंपन्यात पुण्याकडील कामगार वर्ग दररोज ये-जा करीत आहे. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यांच्या आरोग्याबाबत कंपनी प्रशासन विशेष खबरदारी घेत नाही. त्याचाच परिपाक रुग्णवाढीत होत आहे. त्यामुळे तालुक्याचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. कोरोनाचा वणवा आणखी भडकू नये आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी कंपन्यातील कामगारांची राहण्याची व्यवस्था स्वतंत्र करावी किंवा कंपन्या तूर्तास बंदच ठेवाव्यात, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

(चौकट..)

तालुका टास्क फोर्स गरजेचा...

कोरोनाला आळा घालण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करायला हवे. प्रशासनाच्या मदतीला पदाधिकारी धावले तरच हे शक्य आहे. गावोगावच्या लोकांनी उपचारासाठी बेड मिळावेत म्हणून कोणाकडे धाव घ्यावी. मुळातच या कामात अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा समन्वय गरजेचा आहे. पण सध्यातरी तो दिसत नाही. यासाठी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांनी तालुका टास्क फोर्स उभारणे आवश्यक आहे.

कोट..

सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत खंडाळ्यात आहे. यामधील मेडिकल प्रोडक्ट कंपन्या सोडल्या तर कामगारांच्या आरोग्याची काळजी इतर कंपन्यांमधून घेतली जात नाही. त्यामुळे सर्व कंपन्या सुरू असल्याने गावोगावचे कामगार लोक एकमेकांच्या सहवासात येत आहेत. खंडाळा तालुक्यात कोरोना विस्ताराचे मूळ कंपन्यांत बाहेरून येणारे कामगार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या मुळावर घाव घालण्यासाठी काही दिवस कंपन्या बंद ठेवाव्यात.

-नितीन भरगुडे पाटील, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा