शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

शंभूराज देसाई व माझ्यात गैरसमज पसरवू नका, उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

By सचिन काकडे | Updated: June 19, 2023 17:06 IST

सरकार कोणाचे असू दे. आज या पक्षाचे उद्या त्या पक्षाचे. समीकरण नेहमीच बदलत असतात. हे कोणीही विसरू नये

सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे ज्यांची उंची नाही, बौद्धिक पातळी नाही अशा व्यक्तींनी आमच्यात गैरसमज निर्माण करू नये. माझा कोणत्याही कामाला विरोध नाही; परंतु पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र्य हे जपलेच पाहिजे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.मंत्री शंभूराज देसाई यांनी पोवई नाका परिसरात माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित स्मारकाला सातारकर नागरिक व शिवप्रेमींमधून तीव्र विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे यांनी सोमवारी जलमंदिर या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, 'दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे कार्य खूप मोठे आहे. आज यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचे स्मारक आहे. मग बाळासाहेब देसाई यांचे स्मारक का असू नये? या स्मारकाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. तरी देखील काही मंडळी माझा विरोध असल्याचे भासवत आहेत. पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे, ही जशी माझी भूमिका आहे तशीच ती पालकमंत्र्यांची देखील आहे.पूर्वी परिस्थिती वेगळी होती. आता वेगळी आहे. पोवई नाक्यावर भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे इथली जमीन आतून पोकळ झालेली आहे. येथे कोणत्याही प्रकारचे काम करताना सर्व तांत्रिक बाबी विचारात घ्यायला हव्यात. शिवतीर्थ परिसर ऐतिहासिक असून तो तसाच राहावा, अशी सर्व शिवप्रेमींची भावना आहे. त्यामुळे हा परिसर अधिक सुशोभीत कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील.जनतेला डावलता येत नाही..'ज्या त्या मंत्र्यांना त्या-त्या मतदारसंघातील मतदारांनी निवडून दिले आहे. खासदार म्हणून सोडून द्या; परंतु एक व्यक्ती, एक नागरिक म्हणून आम्ही या सरकारचा भाग आहोत. सरकार कोणाचे असू दे. आज या पक्षाचे उद्या त्या पक्षाचे. समीकरण नेहमीच बदलत असतात. हे कोणीही विसरू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही असं म्हटलं नाही की, हे शिवाजी महाराजांचे राज्य आहे. ते नेहमीच म्हणत असत हे रयतेचं राज्य आहे. त्यामुळे जनतेला डावलून कोणीही काहीही करू शकत नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShambhuraj Desaiशंभूराज देसाई