शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST

कऱ्हाड : कोरोनामुळे प्रत्येकजण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडू नये. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मुदत द्यावी, ...

कऱ्हाड : कोरोनामुळे प्रत्येकजण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडू नये. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी भीम आर्मीच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

यावेळी भीम आर्मीचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष अनिकेत साळुंखे, शुभम पवार, शंतनू कुकडे, राहुल साळुंखे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आहे. समाजातील प्रत्येक घटक या संकटाशी लढत आहे. संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे गतवर्षी आणि यंदाही व्यापारी, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींचे व्यवसाय कायमचे बंद पडले. शेतकऱ्यांनाही या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतामध्ये पडून राहिल्यामुळे आर्थिक नुकसान झाले. मात्र, तरीही प्रत्येकजण या संकटातून मार्ग काढत आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

गतवर्षापासून अनेकांची वीजबिले थकीत आहेत. सुरूवातीला ही बिले माफ केली जातील, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर त्यातून माघार घेत बिले भरावीच लागतील, असे सांगण्यात आले. त्यातही वाढीव मुदत देण्यात आली नाही. वीज कंपनीनेही वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा विचार करून वीज कंपनीने थकीत बिलापोटी ग्राहकांची कनेक्शन न तोडता बिले भरण्यासाठी सवलत द्यावी. तसेच टप्प्याटप्प्याने रक्कम स्वीकारावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.