शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बी अन् फटाक्यांचा खर्च दुष्काळग्रस्तांना!

By admin | Updated: September 16, 2015 12:09 IST

खंडाळ्यातही बदलाची लाट : सर्व गणेशोत्सव मंडळांनी जपली समााजिक बांधिलकी

खंडाळा : समाज म्हणजे एकतेचे प्रतीक आहे. समाजाचं हित जोपासणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच कर्तव्यदक्ष भावनेतून सामाजिकतेचे भान ठेवून पारगावच्या तरूणांनी गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर क्रांतिकारी निर्णय घेत डॉल्बीमुक्तीचा नारा दिला आहे. डॉल्बी, गुलाल अन् फटाक्यांवर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे खंडाळा तालुक्यातून कौतुक होत आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून आता बाप्पाच्या मंडपात माणुसकीचा जागर सुरू झाला आहे. गणेशोत्सव म्हटलं की, दहा दिवस डॉल्बी, फटाके आणि मिरवणुकीतून गुलालाची उधळण आलीच; पण, यामुळे होणारे ध्वनी, वायू प्रदूषण लक्षात घेऊन पारगावच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित यादव यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोनशे तरूणांची बैठक घेऊन हा निर्णय एकमुखी घेतला. यामध्ये पारगावमधील न्यू भारत तरूण मंडळ, शिवाजी गणेश मंडळ, जानुबाई तरूण मंडळ, भीमाशंकर गणेशोत्सव मंडळ, न्यू सम्राट तरूण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी सक्रिय सहभाग घेतला. या मंडळांचे अध्यक्ष राजेश यादव, महेश गायकवाड, योगेश चव्हाण, मयूर ढमाळ, गणेश सासणे यांनी आपापल्या मंडळातील कार्यकर्त्यांना डॉल्बीमुक्तीची संकल्पना पटवून दिली. गणेशमंडळांनी मिरवणुकीत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करायची नाही. गणेशोत्सवच नव्हे तर इतर कोणत्याही कार्यक्रमात डॉल्बीचा वापर करायचा नाही. ढोल-लेझीम पथक, हलगी वादन अशा पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: गणेशोत्सव काळात अधिकाधिक खर्च करून, मोठे मोठे डॉल्बी वाजवून आपले मंडळ कसे श्रीमंत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. खंडाळ्यात औद्योगिकीकरण वाढल्याने अशा गोष्टींवर अधिक भर असताना पारगावच्या तरूण मंडळांनी घेतलेला निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरत आहे. दुष्काळग्रस्तांसाठी लाखाचं योगदान सातारा जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस असल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्याचबरोबर राज्यातही दुष्काळ आहे. त्यामुळे येथील जानुबाई तरूण मंडळाने डॉल्बीवर होणाऱ्या खर्चात भर घालून ५० हजार रूपये व अन्य एका मंडळाने ५० हजार रूपये असा लाख रूपयांचा निधी जमा करून दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा त्यांचा प्रयत्न लाखमोलाचा आहे.(प्रतिनिधी)