शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

डॉल्बी अन् फटाक्यांचा खर्च दुष्काळग्रस्तांना!

By admin | Updated: September 16, 2015 12:09 IST

खंडाळ्यातही बदलाची लाट : सर्व गणेशोत्सव मंडळांनी जपली समााजिक बांधिलकी

खंडाळा : समाज म्हणजे एकतेचे प्रतीक आहे. समाजाचं हित जोपासणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच कर्तव्यदक्ष भावनेतून सामाजिकतेचे भान ठेवून पारगावच्या तरूणांनी गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर क्रांतिकारी निर्णय घेत डॉल्बीमुक्तीचा नारा दिला आहे. डॉल्बी, गुलाल अन् फटाक्यांवर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे खंडाळा तालुक्यातून कौतुक होत आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून आता बाप्पाच्या मंडपात माणुसकीचा जागर सुरू झाला आहे. गणेशोत्सव म्हटलं की, दहा दिवस डॉल्बी, फटाके आणि मिरवणुकीतून गुलालाची उधळण आलीच; पण, यामुळे होणारे ध्वनी, वायू प्रदूषण लक्षात घेऊन पारगावच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित यादव यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोनशे तरूणांची बैठक घेऊन हा निर्णय एकमुखी घेतला. यामध्ये पारगावमधील न्यू भारत तरूण मंडळ, शिवाजी गणेश मंडळ, जानुबाई तरूण मंडळ, भीमाशंकर गणेशोत्सव मंडळ, न्यू सम्राट तरूण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी सक्रिय सहभाग घेतला. या मंडळांचे अध्यक्ष राजेश यादव, महेश गायकवाड, योगेश चव्हाण, मयूर ढमाळ, गणेश सासणे यांनी आपापल्या मंडळातील कार्यकर्त्यांना डॉल्बीमुक्तीची संकल्पना पटवून दिली. गणेशमंडळांनी मिरवणुकीत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करायची नाही. गणेशोत्सवच नव्हे तर इतर कोणत्याही कार्यक्रमात डॉल्बीचा वापर करायचा नाही. ढोल-लेझीम पथक, हलगी वादन अशा पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: गणेशोत्सव काळात अधिकाधिक खर्च करून, मोठे मोठे डॉल्बी वाजवून आपले मंडळ कसे श्रीमंत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. खंडाळ्यात औद्योगिकीकरण वाढल्याने अशा गोष्टींवर अधिक भर असताना पारगावच्या तरूण मंडळांनी घेतलेला निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरत आहे. दुष्काळग्रस्तांसाठी लाखाचं योगदान सातारा जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस असल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्याचबरोबर राज्यातही दुष्काळ आहे. त्यामुळे येथील जानुबाई तरूण मंडळाने डॉल्बीवर होणाऱ्या खर्चात भर घालून ५० हजार रूपये व अन्य एका मंडळाने ५० हजार रूपये असा लाख रूपयांचा निधी जमा करून दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा त्यांचा प्रयत्न लाखमोलाचा आहे.(प्रतिनिधी)