शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

रेशनधान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ...

सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ७ हजार ५६८ कुटुंबांनी पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतला आहे.

रेशनिंग दुकानदारांबाबत लोकांच्या अनेक तक्रारी असतात. संबंधित दुकानदार ग्राहकांसोबत नीट व्यवहार करत नाही. अरेरावीची उत्तरे देतो, लोकांना हेलपाटे मारायला लावतो, अशा अनेक तक्रारी असतात. अनेकदा ग्राहक दुकानदारासोबत वाद घालतात. मात्र तरीही दुकानदाच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, तर दुकानच बदलण्याचा विचार ग्राहक करतात. त्यातूनच दुकान बदलण्याचा निर्णय घेण्यात येतो.

सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दुकानांची मर्यादा असल्याने ग्रामीण भागात कमी पण शहरी भागात दुकान बदलण्यासाठी पर्याय असतो, त्यामुळे नागरिक दुकानदाराशी वाद होत असेल तर दुकान बदलून शासनाच्या पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतात.

या व्यतिरिक्त कामानिमित्त गावे बदलावी लागणाऱ्या ग्राहकांनादेखील शासनातर्फे पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य दिले जाते. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनिंग ग्राहकांना धान्याचा लाभ दिला आहे. एप्रिल महिन्यात ७ हजार ३३, मे महिन्यात ७ हजार ५५७, जून महिन्यात ७ हजार ५६८ लोकांनी पोर्टेबिलिटी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये रेशनिंग दुकानदाराशी वाद होत असल्याने दुकान बदलून धान्य घेणाऱ्यांचा समावेश आहे.

.............................असा मथळा आपल्याला करता येईल. सबहेडमध्ये किती जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला याचा उल्लेख करावा...................

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक -

बीपीएल -३,८२,१६४

अंत्योदय -२८२२०

एकूण - ४,१०, ३८४

किती जणांनी दुकानदार बदलला -

२) कोणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार (ग्राफ)

सातारा : ४

वाई : ३

कऱ्हाड : ७

माण : ३

खटाव : ४

कोरेगाव : ७

पाटण : ३

फलटण : ६

महाबळेश्वर : १

जावली : २

खंडाळा : ३

३) शहरात जास्त बदल

शहर परिसरात दुकानदार बदलण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकदा स्वस्त धान्य दुकानदारासोबत पटत नसल्याने ग्राहक कंटाळून दुकानदारच बदलतात. लांब अंतर चालून जावे लागले तरी चालेल; परंतु दुकानदाराशी वाद होण्यापेक्षा ते परवडले, अशी लोकांची मानसिकता आहे.

४) नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

जिल्ह्यातील २८ हजार २८० कुटुंबांनी शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे मोफत धान्य दिले जाणार आहे. शासनाने कोरोनाच्या काळात मोफत धान्य देऊन दिलासा दिला आहे.

फोटो : ०९पुरवठा