शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

रेशनधान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ...

सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ७ हजार ५६८ कुटुंबांनी पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतला आहे.

रेशनिंग दुकानदारांबाबत लोकांच्या अनेक तक्रारी असतात. संबंधित दुकानदार ग्राहकांसोबत नीट व्यवहार करत नाही. अरेरावीची उत्तरे देतो, लोकांना हेलपाटे मारायला लावतो, अशा अनेक तक्रारी असतात. अनेकदा ग्राहक दुकानदारासोबत वाद घालतात. मात्र तरीही दुकानदाच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, तर दुकानच बदलण्याचा विचार ग्राहक करतात. त्यातूनच दुकान बदलण्याचा निर्णय घेण्यात येतो.

सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दुकानांची मर्यादा असल्याने ग्रामीण भागात कमी पण शहरी भागात दुकान बदलण्यासाठी पर्याय असतो, त्यामुळे नागरिक दुकानदाराशी वाद होत असेल तर दुकान बदलून शासनाच्या पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतात.

या व्यतिरिक्त कामानिमित्त गावे बदलावी लागणाऱ्या ग्राहकांनादेखील शासनातर्फे पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य दिले जाते. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनिंग ग्राहकांना धान्याचा लाभ दिला आहे. एप्रिल महिन्यात ७ हजार ३३, मे महिन्यात ७ हजार ५५७, जून महिन्यात ७ हजार ५६८ लोकांनी पोर्टेबिलिटी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये रेशनिंग दुकानदाराशी वाद होत असल्याने दुकान बदलून धान्य घेणाऱ्यांचा समावेश आहे.

.............................असा मथळा आपल्याला करता येईल. सबहेडमध्ये किती जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला याचा उल्लेख करावा...................

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक -

बीपीएल -३,८२,१६४

अंत्योदय -२८२२०

एकूण - ४,१०, ३८४

किती जणांनी दुकानदार बदलला -

२) कोणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार (ग्राफ)

सातारा : ४

वाई : ३

कऱ्हाड : ७

माण : ३

खटाव : ४

कोरेगाव : ७

पाटण : ३

फलटण : ६

महाबळेश्वर : १

जावली : २

खंडाळा : ३

३) शहरात जास्त बदल

शहर परिसरात दुकानदार बदलण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकदा स्वस्त धान्य दुकानदारासोबत पटत नसल्याने ग्राहक कंटाळून दुकानदारच बदलतात. लांब अंतर चालून जावे लागले तरी चालेल; परंतु दुकानदाराशी वाद होण्यापेक्षा ते परवडले, अशी लोकांची मानसिकता आहे.

४) नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

जिल्ह्यातील २८ हजार २८० कुटुंबांनी शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे मोफत धान्य दिले जाणार आहे. शासनाने कोरोनाच्या काळात मोफत धान्य देऊन दिलासा दिला आहे.

फोटो : ०९पुरवठा