शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

रेशनधान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ...

सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ७ हजार ५६८ कुटुंबांनी पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतला आहे.

रेशनिंग दुकानदारांबाबत लोकांच्या अनेक तक्रारी असतात. संबंधित दुकानदार ग्राहकांसोबत नीट व्यवहार करत नाही. अरेरावीची उत्तरे देतो, लोकांना हेलपाटे मारायला लावतो, अशा अनेक तक्रारी असतात. अनेकदा ग्राहक दुकानदारासोबत वाद घालतात. मात्र तरीही दुकानदाच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, तर दुकानच बदलण्याचा विचार ग्राहक करतात. त्यातूनच दुकान बदलण्याचा निर्णय घेण्यात येतो.

सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दुकानांची मर्यादा असल्याने ग्रामीण भागात कमी पण शहरी भागात दुकान बदलण्यासाठी पर्याय असतो, त्यामुळे नागरिक दुकानदाराशी वाद होत असेल तर दुकान बदलून शासनाच्या पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतात.

या व्यतिरिक्त कामानिमित्त गावे बदलावी लागणाऱ्या ग्राहकांनादेखील शासनातर्फे पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य दिले जाते. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनिंग ग्राहकांना धान्याचा लाभ दिला आहे. एप्रिल महिन्यात ७ हजार ३३, मे महिन्यात ७ हजार ५५७, जून महिन्यात ७ हजार ५६८ लोकांनी पोर्टेबिलिटी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये रेशनिंग दुकानदाराशी वाद होत असल्याने दुकान बदलून धान्य घेणाऱ्यांचा समावेश आहे.

.............................असा मथळा आपल्याला करता येईल. सबहेडमध्ये किती जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला याचा उल्लेख करावा...................

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक -

बीपीएल -३,८२,१६४

अंत्योदय -२८२२०

एकूण - ४,१०, ३८४

किती जणांनी दुकानदार बदलला -

२) कोणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार (ग्राफ)

सातारा : ४

वाई : ३

कऱ्हाड : ७

माण : ३

खटाव : ४

कोरेगाव : ७

पाटण : ३

फलटण : ६

महाबळेश्वर : १

जावली : २

खंडाळा : ३

३) शहरात जास्त बदल

शहर परिसरात दुकानदार बदलण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकदा स्वस्त धान्य दुकानदारासोबत पटत नसल्याने ग्राहक कंटाळून दुकानदारच बदलतात. लांब अंतर चालून जावे लागले तरी चालेल; परंतु दुकानदाराशी वाद होण्यापेक्षा ते परवडले, अशी लोकांची मानसिकता आहे.

४) नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

जिल्ह्यातील २८ हजार २८० कुटुंबांनी शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे मोफत धान्य दिले जाणार आहे. शासनाने कोरोनाच्या काळात मोफत धान्य देऊन दिलासा दिला आहे.

फोटो : ०९पुरवठा