शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

विकासाचे राजकारण करा, अन्यथा जशाच तसे उत्तर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 12:52 IST

‘मी जावळी तालुक्यात आल्यामुळे काही जणांची राजकीय दुकानदारी बंद झाली. त्यामुळे त्यांचे पित्त खवळत आहे.

कुडाळ : ‘बोंडारवडी धरण प्रकल्प ५४ गावांसाठी महत्त्वाचा आहे. याबाबत विरोधकांनी जनतेच्या मनात माझ्याविषयी गैरसमज पसरवू नयेत, तालुक्यात विकासाचे राजकारण करावे, अन्यथा जशाच तसे उत्तर देण्यात येईल,’ असा हल्लाबोल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. आंबेघर येथे ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई रांजणे, मेढ्याचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, जावळी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, पंचायत समिती सदस्या अरुणा शिर्के, कांताबाई सुतार, विजय सुतार, जयदीप शिंदे, शिवाजीराव मर्ढेकर, दत्तात्रय पवार, विजयराव शेलार, कविता धनावडे, शांताराम पार्टे, माजी सभापती हणमंत पार्टे यांची उपस्थिती होती.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मी जावळी तालुक्यात आल्यामुळे काही जणांची राजकीय दुकानदारी बंद झाली. त्यामुळे त्यांचे पित्त खवळत आहे. बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा प्रश्न ५४ गावांसाठी महत्त्वाचा आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण झाले पाहिजे हीच माझी भूमिका आहे. या प्रकल्पाबाबत मी बंधारा बांधणार असे गैरसमज जनतेत पसरविले जात आहेत. जावळी बँकेचे कामकाज चांगले चालले असून यात कोणी राजकारण आणू नये. आगामी काळात नगरपंचायतीसह जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ताकदीने लढविणार आहे.’

वसंतराव मानकुमरे म्हणाले, ‘शेतकऱ्यांसाठी प्रतापगड कारखान्यास आमदार भोसले यांनी मदत करावी. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गनिमी कावा करून रांजणे यांनी यश मिळविले आहे. जावळीत शशिकांत शिंदेंचे एखादे दमदार काम दाखवा. यापुढे तालुक्यात गुंडगिरी व दहशत पसरविल्यास निश्चित उत्तर दिले जाईल.’

रांजणे म्हणाले, ‘तालुक्यातील जनतेने ही निवडणूक हातात घेऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विजयी केले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक हे फक्त निमित्त होते. जावळी तालुक्यात येऊन दादागिरी करायची, लोकांची माथी भडकवायची असले प्रकार वाढू लागल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे व वसंतराव मानकुमरे यांच्यासह सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. म्हणूनच मी ही लढाई जिंकू शकलो. शेवटच्या श्वासापर्यंत आमदार भोसले यांच्यासोबत काम करणार आहे. बोंडारवाडी धरणाच्या प्रश्नावरून विरोधक केवळ राजकारण करीत आहेत.’

कोरोनामध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या जयश्री शेलार यांच्यासह क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या यश रांजणे, कादंबरी शेलार, अंगणवाडी सेविका, आशा, सरपंच, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

रामभाऊ शेलार यांनी प्रास्ताविक, तर चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. सागर धनावडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले