शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

महामार्गावर लोकांनी कंदील लावून फिरायचे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST

सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावरील विजेचे दिवे बंद आहेत. रस्त्याची जागोजागी दुरवस्था आहे. अंडरपासमध्ये घाणीचे साम्राज्य साठलेय. तर जे फ्लायओव्हर ...

सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावरील विजेचे दिवे बंद आहेत. रस्त्याची जागोजागी दुरवस्था आहे. अंडरपासमध्ये घाणीचे साम्राज्य साठलेय. तर जे फ्लायओव्हर ब्रीज आहेत, तिथेही विजेची सोय नाही. लोकांनी महामार्गावर फिरताना कंदील लावूनच फिरायचे का?, असा संतप्त सवाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेला आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीमध्ये केंद्रीय योजनांवर विशेष चर्चा झाली. महामार्गाचे प्रश्न तसेच जलजीवन मिशनमधील रखडलेले प्रस्ताव यावर विशेष चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ ते शेंद्रे या अंतरामध्ये ज्या दुरवस्था आहेत, त्यावर बैठकीत विशेष चर्चा झाली. केंद्र शासनाशी केलेल्या करारानुसार महामार्गाच्या देखभालीचा खर्च संबंधित कंत्राटदाराने करायचा आहे. गरजेच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कामे करावीत, त्याला केंद्राकडून निधी किंवा मंजुरीची आवश्यकता पडल्यास आपण आणू, पण कामे रखडवलेली खपवली जाणार नाही. लोकसभेत मुद्दा मांडला तर तुम्हाला अडचणीचे ठरेल, असा इशाराच खासदार पाटील यांनी दिला.

ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना करुन खासदार श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. यामध्ये तेथील गावांतील जनावरांचा समावेश करून प्रस्ताव तयार करावा. प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळाले पाहिजे या हेतूने अधिकाऱ्यांनी काम करावे. याबाबत स्वतंत्र बैठक घ्यावी.

प्रधानमंत्री आवास योजनेची प्रलंबित कामे लवकरात लवकर करावी. रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीमध्ये सातारा जिल्ह्याचे चांगले काम झाले आहे. या कामांची सक्सेस स्टोरी तयार करावी. तसेच समितीच्या सदस्यांच्या सूचना असतील त्या लेखी स्वरूपात मला द्याव्यात. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे दर्जेदार करा. याबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत कामे करताना गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन करावीत, अशा सूचना आमदार महेश शिंदे यांनी केल्या.

चौकट..

‘किसान सन्मान’चे पैसे शेतकऱ्यांना मिळेनात

पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना २ हजार रुपयांची मदत दिली जाते. मात्र सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी करुनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी सूचना खासदार पाटील यांनी केली.

फाेटोनेम : ०८झेडपी

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिशा सनियंत्रण समितीची बैठक झाली.