शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाषणं नको.. घोषणा हवी सातारकरांची अपेक्षा : सर्वच राजकीय पक्षांचे नेते आज एकाच व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:59 IST

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित गौरव सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित गौरव सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह मंत्री, नेते मंडळींची भाषणं ऐकण्यासाठी गर्दी होणार आहेत; त्याहीपेक्षा साताºयाच्या विकासासाठी कोणत्या घोषणा होतात? याकडे लक्ष असणार आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी गौरव सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्ताने राज्यभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री विजय शिवतारे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, ‘रिपाइं’चे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आल्यानंतर साहजिकच चिमटे काढणे, टोमणे मारणे आदी प्रकार भाषणातून होत असतात. एकमेकांवर चिखलफेक करणारे एका व्यासपीठावर आल्यावर काय बोलणार? हे सर्वसामान्यांसाठी उत्सुकतेचे असते. भाषणांपेक्षाही महत्त्वाच्या घोषणा होणे गरजेचे आहेत. त्याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागणार आहे.साताºयातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. मुख्यमंत्री सहा महिन्यांपूर्वी सातारा दौºयावर आले होते. तेव्हा एका महिन्यात प्रश्न सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली होती; पण पुढे काहीच झाले नाही. शनिवारच्या कार्यक्रमात ठोस उपाय काढण्याची गरज आहे.

साताºयाच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासन दरबारी १९९६ पासून धूळखात पडून आहे. त्यावर निर्णय झाल्यास त्रिशंकू भागातील नागरिकांच्या समस्या दूर होणार आहेत. वाढत्या शहरीकरणाबरोबरच कचराडेपोचीही मोठी समस्या आहे. सोनगाव कचरा डेपोतील कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे परिसरातील गावांमधील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जमा होणाºया कचºयापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारल्यास मोठा उद्योग उभारू शकतो. यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा करणे गरजेचे आहे.

सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी येणाºया गाड्यांची चाचणी घेण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे त्या कºहाडला पाठवाव्या लागतात. यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.‘मॅग्नेटिक सातारा’ व्हावासाताºयाची औद्योगिक वसाहत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आहे. मोठी जागा उपलब्ध आहे. अनेक उद्योगपतींनी जागा खरेदीही करून ठेवल्या आहेत; पण शिरवळ, खंडाळा, कºहाडच्या तुलनेत चांगले उद्योग आलेले नाही. त्यामुळे उद्योगजकांना आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक सातारा’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस घोषणा करण्याची गरज आहे. यामुळे उद्योग उभारल्यास रोजगार निर्मितीही होणार आहे.अजिंक्यताराच्या विकासासाठी हवाय निधीसातारा जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभला आहे. वेगवेगळ्या भागातून आलेले पर्यटक हमखास अजिंक्यतारा किल्ल्यावर जातात. काही दिवसांपूर्वी सहलीसाठी आलेल्या गाडीला अपघात झाला होता. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न समोर आला. तसेच किल्ल्यावर वीज नाही. अजिंक्यताराच्या विकासासाठी निधीची घोषणा होणे गरजेचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर