शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते अन् बियाणे कमी पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:41 IST

सातारा : ‘खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १ लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ...

सातारा : ‘खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १ लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ४४ हजार ५३५ क्विंटल बियाण्यांची मागणी शासनाकडे केली आहे. हवामान विभागाने यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे खते व बियाण्यांपासून शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी’, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

सातारा येथे जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार अरुण लाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधने आली असली तरीही राज्यासह देशात कृषी उत्पन्न वाढले आहे, असे सांगून पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, खरीप हंगामात जिल्ह्यात अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विकले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्यावर कृषी विभागाने भर द्यावा तसेच खतांचा अधिकचा स्टॉक करून ठेवावा.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, खंडाळा, फलटण आणि माण तालुक्यात उन्हाळी कापूस पीक घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांना चांगले ‍बियाणे उपलब्ध करून देण्याबरोबरच खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यात यावे.

खरीप हंगामात खासगी बँकांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करावा. त्याचबरोबर कर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, अरुण लाड यांनीही सूचना केल्या.

या बैठकीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी प्रास्ताविक केले.

फोटो १७सातारा ॲग्रो फोटो...

फोटो ओळ : सातारा येथे सोमवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळसाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मार्गदर्शन केले. (छाया : जावेद खान)

.........................................................................