शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कांद्यामुळेही धुमधडाक्यात दिवाळी

By admin | Updated: November 9, 2015 23:29 IST

ज्या कोणी केली त्यांना मात्र वधारलेल्या दरामुळे लॉटरीच लागली. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर चालूवषी कांद्याने गाठला

चालूवर्षी कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची दिवाळी होणार गोड. शेतकऱ्याच्या मालाला बाजारात मिळणाऱ्या बाजार भावामुळे आतापर्यंत आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असतानाच सध्या जीवनावश्यक असणाऱ्या कांद्याने मात्र उच्चांकी दर गाठल्यामुळे आडसाल कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची दिवाळी गोड झाली आहे. निसर्गाच्या मनात कधी काय येईल, हे कोणालच न उलगडणारं सत्य आहे. आणि या निसर्गाच्या बदलामुळे म्हणा किंवा कांद्याच्या उत्पादनात आलेल्या घटीमुळे बाजारामध्ये एकदम कांद्याचे दर वधारले आणि गृहिणींच्या डोळ्यात कांद्यामुळे नव्हे तर कांद्याच्या दरामुळे पाणी येऊ लागले. आडसाल विकला जाणारा कांद्याचे दर एकदम तेजीत आले. तर खटाव-माण सारख्या दुष्काळी पट्ट्यात आजही कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ (ऐरण)चा वापर सर्रास शेतकरी वर्ग करताना दिसून येतो का, काढणीनंतर जर कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर निघालेल्या कांद्याची योग्यरित्या या चाळीत साठवणूक करून हा कांदा सुरक्षित ठेवला जातो. आणि योग्य दर आल्यानंतर या ऐरणी फोडून बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवतात. दरवर्षी कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या उत्पादनातून पिकासाठी केलेल्या खर्चाइतपतही पैसे मिळत नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची लागण केली नाही. तर ज्या कोणी केली त्यांना मात्र वधारलेल्या दरामुळे लॉटरीच लागली. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर चालूवषी कांद्याने गाठला. आणि २५ ते ७० रु पयांपर्यंत दर लागत गेला. त्यामुळे शेतकरीऱ्याला ज्या कांद्याच्या उत्पादनातून उलटी पट्टी येत होती तेथे कांद्याच्या पिकाने विक्रमच केला. आणि कांदा उत्पादक शेतकरी मालामाल झाला. शेतातच कांद्याचा सौदा व्यापारी लोक करू लागल्यामुळे मार्केटमध्येही शेतकऱ्याला जाण्याची गरज पडली नाही. प्रत्येकवर्षी दुष्काळी परिस्थिीती निर्माण होतेच . खटाव-माण तालुक्यांत या दुष्काळी परिस्थितीला येथील शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत बऱ्याच शेतकऱ्याला या पिकाने तारले असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना कांद्याच्या उत्पादनातून फायदा झाला आहे. त्यामुळे चालूवर्षी निदान दिवाळी सण तरी उत्साहाने व आनंदाने साजरा करता येईल, याची आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. कांद्यामुळे मात्र चालूवर्षी शेतकऱ्यांची दिवळी गोड होणार आहे. --नम्रता भोसले