शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

जिल्ह्याची तब्बल २७९ कोटी रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:26 IST

सातारा : कोरोनाकाळातील वीजबिल वसुलीसाठी थेट कनेक्शन तोडण्याचा इशारा महावितरण कंपनीने दिल्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटू लागले आहेत. सातारा ...

सातारा : कोरोनाकाळातील वीजबिल वसुलीसाठी थेट कनेक्शन तोडण्याचा इशारा महावितरण कंपनीने दिल्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात शेतीपंपाचे वगळून तब्बल २७९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांना वीज तोडण्याचा इशारा न देता बिल भरण्यासाठी प्रवृत्त करण्याची भूमिका कंपनीने घेणं आवश्यक आहे.

दरम्यान, भरणा सुलभ व्हावा, यासाठी थकबाकीचे हप्ते पाडून देण्याची योजना सुरू करणे हाही उत्तम पर्याय ठरू शकतो. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या वेळी जीवनावश्यक गरजेची दुकाने सोडली तर सर्वच दुकाने प्रशासनाने बंद केली. काही व्यावसायिकांनी दुकाने पुढं बंद ठेवून मागच्या दाराने व्यवसाय केले. मूठभर ग्राहकांसाठी सर्व यंत्रणा सुरू राहिल्याने वीजबिलं वाढलं. अजिबातच ग्राहक फिरकत नाही आणि दुकानात माल पडून राहण्यापेक्षा तो थोडा जादा दराने विकून नफा कमवण्याचा मोह काही व्यावसायिकांना झाला. परिणामी त्यांनी व्यावसायिक विजेचा वापर केला आणि बिलाचा आकडा वाढला.

कोविडकाळात म्हणजे एप्रिल २०२० पासून वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील १४ लाख ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यांत करण्याचे निर्देश कंपनीच्या पुणे विभागीय संचालकांनी दिले होते. यावरून ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली. लॉकडाऊन असल्याने आम्ही वीज वापरली नाही, असं व्यापारी म्हणतायत तर वीज वापरली म्हणून बिल आले हे महावितरणचे मत आहे.

कंपनीकडून ग्राहकांसमोर वस्तुस्थिती मांडून सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वीज कंपनीने एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. राज्यातील ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार ग्राहकांनी एकही वीजबिल भरले नाही. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३ लाख ३९ हजार ५८ ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे २७९ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

कोट

ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीजखरेदी करावी लागत असून विजेच्या वाहतुकीवरही मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी

चौकट :

घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येणार आहे.

विज वितरणाचा खर्चही अफाट

महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी आपल्या थकीत वीजबिलांचा भरणा करावा. वीजबिल वसुलीचे प्रमाण कमी असल्याने दरमहा वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी येत्या काही दिवसांत या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

पॉर्इंटर

३ लाख ३९ हजार ५८ ग्राहक

२७९ कोटी रूपयांची थकबाकी

विभागानिहाय थकबाकी

उपविभाग : वीज ग्राहक : रक्कम लाखांत

कऱ्हाड : ९१२९३ : ५५८८.३३

फलटण : ६४७१९ : ९१७०.७३

सातारा : ८०१३७ : ६१८२.१४

वडूज : ५८०७१ : ४८२३.७४

वाई : ४४८३८ : २१६०.३८