शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

जिल्हा पाणीटंचाईच्या दारात

By admin | Updated: January 14, 2015 00:33 IST

तरतूद उन्हाळ््याची : धरणातील साठ्यांचे नियोजन करण्याचे आव्हान

सचिन काकडे - सातारा -उन्हाळा सुरू झाला नसला तरी जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सुमारे ५० टक्के तर माण, खटाव तालुक्यात काही ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील प्रमुख कोयना, धोम, उरमोडी, कण्हेर, भाटघर या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी असला तरी सद्य:स्थिती पाहता उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करणे हे व्यवस्थापनापुढे आव्हान आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहे. यातील कोयना हे सर्वांत मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात आजमितीस ८३.३६ टीमएसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ७२.५९ टीएमसी इतका साठा होता.यावर्षी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने व्यवस्थापनापुढील अनेक अडचणी सुटल्या असल्या तरी गेल्या वर्षी उन्हाळ्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता विजेसह सिंचन व शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, खंडाळा, सातारा, कऱ्हाड, पाटण, दहिवडी या ठिकाणी सध्या पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र महाबळेश्वरला यंदा पावसाने सरासरीही न गाठल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत. फलटणमधील ६२ गावांत पाणीटंचाईजिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई फलटण तालुक्यात जाणवत आहे. तालुक्यात एकूण १२८ गावे आहेत. त्यापैकी ३६ गावे नीरा उजव्या कालव्याखाली येतात. धोम-बलकवडी कालव्यामुळे ३० गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. उर्वरित ६२ गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धोम-बलकवडी कालव्याचे काम पूर्ण झाल्यास याही गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. मात्र निधीअभावी कालव्याचे काम रखडले आहे. तालुक्यातील आंदरुढ, जावली, मिरढे, वडले, दुधेबावी, बोडकेवाडी, धुमाळवाडी, विंचुर्णी, मिरगाव आदी ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीही केली आहे. धरणे आणि साठवणक्षमता (टीएमसी मध्ये)धरणक्षमतासध्याचा पाणीसाठाकोयना१0५.२५८३.३६धोम १३.५0९.१३कण्हेर १0.१0७.६५उरमोडी ९.९६८.९३धोम-बलकवडी 0४.0८२.२२येरळवाडी १.१६०.५९माणमध्ये टँकरची मागणीमाण तालुक्यात असणारे सिमेंट बंधारे व तलावांत यावर्षी मुबलक पाणीसाठा झाल्याने याठिकाणी पाणीटंचाईची समस्या मिटली असली तरी इंजबाब, शंभूखेड व हवलदारवाडी याठिकाणी पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. ग्रामस्थांनी पाणी टॅँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. बिजवडी येथे नववर्षाच्या सुरुवातील पाणीटंचाई निर्माण झाल्याने याठिकाणी विहीर अधिग्रहण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.