शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

जिल्हा पाणीटंचाईच्या दारात

By admin | Updated: January 14, 2015 00:33 IST

तरतूद उन्हाळ््याची : धरणातील साठ्यांचे नियोजन करण्याचे आव्हान

सचिन काकडे - सातारा -उन्हाळा सुरू झाला नसला तरी जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सुमारे ५० टक्के तर माण, खटाव तालुक्यात काही ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील प्रमुख कोयना, धोम, उरमोडी, कण्हेर, भाटघर या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी असला तरी सद्य:स्थिती पाहता उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करणे हे व्यवस्थापनापुढे आव्हान आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहे. यातील कोयना हे सर्वांत मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात आजमितीस ८३.३६ टीमएसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ७२.५९ टीएमसी इतका साठा होता.यावर्षी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने व्यवस्थापनापुढील अनेक अडचणी सुटल्या असल्या तरी गेल्या वर्षी उन्हाळ्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता विजेसह सिंचन व शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, खंडाळा, सातारा, कऱ्हाड, पाटण, दहिवडी या ठिकाणी सध्या पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र महाबळेश्वरला यंदा पावसाने सरासरीही न गाठल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत. फलटणमधील ६२ गावांत पाणीटंचाईजिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई फलटण तालुक्यात जाणवत आहे. तालुक्यात एकूण १२८ गावे आहेत. त्यापैकी ३६ गावे नीरा उजव्या कालव्याखाली येतात. धोम-बलकवडी कालव्यामुळे ३० गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. उर्वरित ६२ गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धोम-बलकवडी कालव्याचे काम पूर्ण झाल्यास याही गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. मात्र निधीअभावी कालव्याचे काम रखडले आहे. तालुक्यातील आंदरुढ, जावली, मिरढे, वडले, दुधेबावी, बोडकेवाडी, धुमाळवाडी, विंचुर्णी, मिरगाव आदी ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीही केली आहे. धरणे आणि साठवणक्षमता (टीएमसी मध्ये)धरणक्षमतासध्याचा पाणीसाठाकोयना१0५.२५८३.३६धोम १३.५0९.१३कण्हेर १0.१0७.६५उरमोडी ९.९६८.९३धोम-बलकवडी 0४.0८२.२२येरळवाडी १.१६०.५९माणमध्ये टँकरची मागणीमाण तालुक्यात असणारे सिमेंट बंधारे व तलावांत यावर्षी मुबलक पाणीसाठा झाल्याने याठिकाणी पाणीटंचाईची समस्या मिटली असली तरी इंजबाब, शंभूखेड व हवलदारवाडी याठिकाणी पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. ग्रामस्थांनी पाणी टॅँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. बिजवडी येथे नववर्षाच्या सुरुवातील पाणीटंचाई निर्माण झाल्याने याठिकाणी विहीर अधिग्रहण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.