शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दहन, मोर्चा अन् घोषणांनी जिल्हा ढवळला

By admin | Updated: June 6, 2017 00:55 IST

दहन, मोर्चा अन् घोषणांनी जिल्हा ढवळला

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : सातारा, जावळी व वाई तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेल्या पाचवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व विविध शेतकरी संघटनांच्यावतीने शेतकऱ्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी महामार्ग रोखून धरत शासानाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून भाजपा सरकार विरोधात जोरदार निदर्शने व घोषणाबाजी करीत बंद यशस्वी करण्यात आला. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांकडून उडतरे येथे महामार्गावर टायर पेटवून वाहतूक अडविण्यात आलीतीन तालुक्यांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या पाचवड या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोरेगावचे आमदार शशिकांत शिंंदे, वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन समितीचा अहवाल, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालास हमीभाव याबाबत भाजप सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नाही, त्यांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे असे विविध अनुभव उपस्थितांपुढे मांडत आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर निषेध करताच उपस्थित शेतकऱ्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करीत महामार्ग अर्धा तास रोखून धरला. दरम्यान उडतरे गावानजीक महामार्गावर शेतकऱ्यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूला भलेमोठे टायर पेटवल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पाचवड येथे तैनात असलेला पोलिसांचा फौजफाटा ताबडतोब घटनास्थळी दाखल झाला व पेटलेले टायर महामार्गावरून बाजूला काढले. किसन वीर कारखान्याची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानंतर महामार्ग सुरळीत करण्यात आला.