शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘स्वाध्याय’ उपक्रमात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वाध्याय उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ५६ हजार ४८१ मुलांनी सहभाग नोंदविला आहे. पहिली ते दहावीच्या मुलांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे. स्वाध्याय मालिका उपक्रमात प्रश्न रचना ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित असल्यामुळे मुलांना स्वाध्याय मालिकेतील प्रश्न नवनवीन आव्हान देणारी आहेत. याचमुळे मुलांना स्वाध्याय सोडवणे आवडत आहे. या स्वाध्याय उपक्रमाची लिंक जिल्ह्यातील शिक्षकांच्या ग्रुपवर पाठवली जाते. नंतर ती लिंक पालकांच्या मोबाइलवर पाठवून दिल्यावर मुलं या लिंकमधील प्रश्न आवडीने सोडवतात.

अशी आहे आकडेवारी

४,२१,१८३

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी

३,५६,४८१

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी

२,६२,६३५

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी

मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात इयत्तानिहाय पाठ्य घटकावर आधारित पूर्ण होण्यास विद्यार्थ्यांना मदत मिळावी, हा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वाध्याय उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. विद्यार्थी स्वाध्याय सोडवित असून, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे काम सुरू आहे.

- रवींद्र खंदारे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

शिक्षण प्रवाहाशी जोडणारा उपक्रम

स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम घेतला जात आहे. जिल्ह्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण प्रवाहाशी जोडणारा एक नवीन शैक्षणिक सेतू तयार झाला आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

विद्यार्थी म्हणतात...

शासनाने सुरू केलेल्या स्वाध्याय उपक्रमामुळे अभ्यासात सातत्य राहत आहे. या उपक्रमाचा परीक्षेत मोठा लाभ होणार आहे. यामुळे गुणही चांगले मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

- रणजित पिसाळ, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा

स्वाध्याय उपक्रमामुळे आम्हाला परीक्षेचा सराव होत आहे. वेगवेगळ्या विषयांचे स्वाध्याय येतात. इंग्रजी विषयाचा येत नाही. या सरावामुळे भविष्यातील परीक्षा कोणत्याही दडपणाविना देता येणार आहे.

- िि

ि

(विद्यार्थी फोटो आहे)