शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस ‘व्हेंटिलेटरवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:00 IST

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मूत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज साडेआठ हजार लिटर पाण्याची ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मूत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज साडेआठ हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे पाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसलेल्या रुग्णांवर डायलेसीस केले जाते. एकावेळी १२ रुग्णांवर डायलेसीसची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. दहा ते बारा हजार रुपये खासगी रुग्णालयामध्ये मोजावे लागत असल्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये डायलेसीस करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे सिव्हिलमध्ये डायलेसीससाठी येणाºया रुग्णांची संख्या जास्त आहे. अतिदक्षता विभागामध्ये ज्या पद्धतीने रुग्णांवर उपचार केले जातात. त्याचपद्धतीने हाही विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज तब्बल साडेआठ हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची कमतरता झाली तर रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा पुरवठा योग्यरितीने होणे गरजेचे असताना सिव्हिलमध्ये मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याचा खेळखंडोबा सुरू आहे. जीवन प्राधिकरणकडून सिव्हिलला पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा आठवड्यातून चार ते पाचवेळा खंडित होत आहे. त्यामुळे डायलेसीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी चिंताग्रस्त होत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत झाला तर नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिव्हिलमधील काही कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. मात्र, एकमेकांवर टोलवाटोलवी केल्यामुळे कधी- कधी पाण्याअभावी डायलेसीस मशीनचा वापर कमी प्रमाणात करावा लागत आहे. एका रुग्णांवर साधारण अडीच ते तीन तास डायलेसीस करावे लागते. मात्र, पाणी कमी असेल तर हे प्रमाण दीड ते दोन तासांवरही येते. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. या विभागात काम पाहणाºया टेक्निशियनला पाणी उपलब्ध झाले तरच रुग्णांवर डायलेसीस करता येते. रुग्णांची जबाबदारी या त्यांच्यावर असल्यामुळे पाण्यासाठी तळमळीने त्यांना याचना करावी लागत आहे.रुग्णांना मोफत पास..डायलेसीस रुग्णांना वारंवार रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे शासनाने रुग्णांना एसटीचा मोफत पास दिला आहे. रुग्णांची गैरसोय आणि मनोबल खचू नये, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. काही रुग्णांना एक दिवसाआड डायलेसीस करावे लागते तर काहींना आठवड्यातून एकदा डायलेसीस करावे लागते. अशांसाठी एसटीचा मोफत पास दिला जात असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले.