शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस ‘व्हेंटिलेटरवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:00 IST

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मूत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज साडेआठ हजार लिटर पाण्याची ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मूत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज साडेआठ हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे पाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसलेल्या रुग्णांवर डायलेसीस केले जाते. एकावेळी १२ रुग्णांवर डायलेसीसची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. दहा ते बारा हजार रुपये खासगी रुग्णालयामध्ये मोजावे लागत असल्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये डायलेसीस करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे सिव्हिलमध्ये डायलेसीससाठी येणाºया रुग्णांची संख्या जास्त आहे. अतिदक्षता विभागामध्ये ज्या पद्धतीने रुग्णांवर उपचार केले जातात. त्याचपद्धतीने हाही विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज तब्बल साडेआठ हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची कमतरता झाली तर रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा पुरवठा योग्यरितीने होणे गरजेचे असताना सिव्हिलमध्ये मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याचा खेळखंडोबा सुरू आहे. जीवन प्राधिकरणकडून सिव्हिलला पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा आठवड्यातून चार ते पाचवेळा खंडित होत आहे. त्यामुळे डायलेसीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी चिंताग्रस्त होत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत झाला तर नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिव्हिलमधील काही कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. मात्र, एकमेकांवर टोलवाटोलवी केल्यामुळे कधी- कधी पाण्याअभावी डायलेसीस मशीनचा वापर कमी प्रमाणात करावा लागत आहे. एका रुग्णांवर साधारण अडीच ते तीन तास डायलेसीस करावे लागते. मात्र, पाणी कमी असेल तर हे प्रमाण दीड ते दोन तासांवरही येते. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. या विभागात काम पाहणाºया टेक्निशियनला पाणी उपलब्ध झाले तरच रुग्णांवर डायलेसीस करता येते. रुग्णांची जबाबदारी या त्यांच्यावर असल्यामुळे पाण्यासाठी तळमळीने त्यांना याचना करावी लागत आहे.रुग्णांना मोफत पास..डायलेसीस रुग्णांना वारंवार रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे शासनाने रुग्णांना एसटीचा मोफत पास दिला आहे. रुग्णांची गैरसोय आणि मनोबल खचू नये, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. काही रुग्णांना एक दिवसाआड डायलेसीस करावे लागते तर काहींना आठवड्यातून एकदा डायलेसीस करावे लागते. अशांसाठी एसटीचा मोफत पास दिला जात असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले.