शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

जिल्हा बॅँकेचे पाचजण निवडणूक रिंंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 8:51 PM

सत्ताधारी गटाचे १५ आणि रयतचे ६, असे याठिकाणी बलाबल आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यातच प्रमुख लढत झाली होती. हे दोघेही बँकेचे संचालक आहेत.

ठळक मुद्देआठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक निवडणूक लढविणार आहेत.

अविनाश कोळी ।सांगली : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच जिल्ह्यातील आठही विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी जिल्हा बँक आली आहे. बहुतांश संचालक या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असून, पाच संचालक निवडणुकीच्या रिंगणात उतरणात आहेत. खासदार, आमदारांसह अनेक महत्त्वाच्या पदांवर विराजमान असलेले संचालक मंडळ निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे.

जिल्हा बँकेत एकूण २१ संचालक आहेत. रयत आणि शेतकरी पॅनेल अशा दोन गटात ही निवडणूक झाली होती. कोणत्याही पॅनेलला पक्षीय रंग नव्हता. त्यामुळे सत्ताधारी शेतकरी पॅनेलमध्ये सर्वपक्षीय संचालकांचा समावेश आहे. दुसरीकडे रयतमध्ये बहुतांश काँग्रेसचे संचालक आहेत. सत्ताधारी गटाचे १५ आणि रयतचे ६, असे याठिकाणी बलाबल आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यातच प्रमुख लढत झाली होती. हे दोघेही बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बँक राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली. आता विधानसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघातून राष्टÑवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, खानापूरमधून शिवसेनेचे आ. अनिल बाबर, पलूस-कडेगाव मतदारसंघातून भाजपचे नेते व बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मिरज मतदारसंघातून राष्टÑवादीचे बाळासाहेब होनमोरे, जत मतदारसंघातून काँग्रेसचे विक्रम सावंत हे पाच संचालक निवडणूक मैदानात उतरणार आहेत.

आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळामार्फत जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. पाच संचालक रिंगणात आणि उर्वरित संचालक किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहेत.

भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. मोहनराव कदम, बँकेचे अध्यक्ष व राष्टÑवादीचे नेते दिलीपतात्या पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील हे निवडणुकीत प्रमुख भूमिकेत असणार आहेत. उर्वरित संचालकही त्यांच्या पक्षाशी बांधील राहून निवडणुकीत कार्यरत राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी गटातील संचालक आमने-सामने येणार आहेत. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षही व्यक्तिगत मैत्री बाजूला ठेवून एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. सत्ताधारी गटात यावरून जुंपणार आहे. बँकेच्या सत्ताधारी गटातील संचालकच प्रचाराच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप करताना दिसणार आहेत. संचालक मंडळात गेल्या चार वर्षात पक्षीय संघर्ष कधीही दिसला नाही. व्यक्तिगत पातळीवरचे राजकारण अनेकदा रंगले, मात्र पक्ष म्हणून एकमेकांसमोर कधीही संचालक आले नाहीत. लोकसभा निवडणुकीत याची थोडी चुणूक दिसली होती. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत ते पक्षीय लेबल घेऊन एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. त्यामुळे येथील राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकbankबँकVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक