शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST

मायणी : खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे सुमारे तीन ...

मायणी : खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे वीज कंपनीने या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तोंडावर मायणीसह पश्चिम-उत्तर काही भागातील ग्रामस्थांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.

याबाबत माहिती अशी की, येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून मायणी परिसरातील मायणीसह चितळी, गुंडेवाडी, मोराळे, व मरडवाक या पाच गावांसाठी पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मायणी प्रादेशिक नळ पाणी परवठा योजना सुरू करण्यात आली आहे. पाणी पुरवठा योजना सुरू केल्यापासून विविध कारणांमुळे ही योजना सतत बंद राहत होती.

दोन वर्षांपूर्वी या योजनेचे मोठ्या प्रमाणात लाईट बिल येत असल्याने व लहान गावांना योजना न परवडणारी असल्याने चितळी मोराळे गुंडेवाडी व मरडवाक या चार गावांनी या योजनेतील आपला सहभाग काढून घेतला. तेव्हापासून केवळ मायणी गावासाठी ही योजना कार्यान्वित होती. मात्र या योजनेवर असलेली शंभर हाऊस पॉवरची मोटर व त्याचे येणारे लाईट बिल व मायणी गावासही न परवडणारे आहे.

या योजनेचे थकीत वीज बिल ३ कोटी १२ लाखांचा आसपास गेले आहे. चार-पाच दिवसांपूर्वी मायणी ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागास २ लाख रुपये थकीत बिलापोटी भरले होते. मात्र थकबाकीची रक्कम मोठी असल्याने २ लाख भरल्यानंतर ही संबंधित विभागाने अधिक पैसे भरण्याची मागणी करत योजनेचा पुरवठा खंडित केला.

त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मायणीच्या पश्चिम व उत्तर भागातील लक्ष्मीनगर, सराटे मळा, चांदणी चौक परिसर मोराळे रोड मरडवाक रोड कचरेवाडीतील काही भाग या ठिकाणी या ठिकाणातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून वीज पुरवठा सुरळीत करून ऐन उन्हाळ्यात पाण्याची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चौकट

पर्यायी व्यवस्थाही अशक्य

सुमारे ३ कोटी रुपये प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. गत दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने थोडी रक्कम भरली आहे. तसेच नवीन योजना किंवा इतर पर्यायी व्यवस्था लगेच बघणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी आपला थकीत घरफळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सचिन गुदगे यांनी केले आहे.