शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 राज्यातील सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा डाव: शिवेंद्र्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:56 IST

सातारा : ‘केंद्र, राज्यातील सरकारच्या मनमानी धोरणांमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार, सर्वसामान्य जनता सुखी नाही. या सरकारने नोटा बंदीचा निर्णय ...

सातारा : ‘केंद्र, राज्यातील सरकारच्या मनमानी धोरणांमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार, सर्वसामान्य जनता सुखी नाही. या सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेतला, त्यामुळे देशाचे अर्थकारण बदलले. सुरळीत चाललेल्या बँका अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली. सहकार क्षेत्र कोलमडून टाकण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला,’ असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.लिंबखिंड-पानमळेवाडी येथे आयोजित लिंब व शाहूपुरी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र्र सावंत, संजय पाटील, बाळासाहेब गोसावी, प्रल्हाद चव्हाण, नंदाभाऊ जाधव उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘जीएसटीसारख्या निर्णयामुळे वेगळाच पेच प्रसंग निर्माण झाला आहे. जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करणारे बांधकाम क्षेत्र रेराच्या अंबलबजावणीमुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे सर्वांना त्रासदायक ठरणारे हे सरकार हटविण्याचा निर्धार या निवडणुकीत करू या.’खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आपला बहुमोल वेळ वादावादीत वाया घालवू नका. कारण वेळ एकदा गेली की पुन्हा ती आणू शकत नाही. वेळ सत्कारणी लावण्यासाठी कायमस्वरुपी गैरसमज ठेवू नका. त्यातून आपणा सर्वांचाच तोटा होतो आणि नको त्यांचा फायदा होतो. गांधीजींनी देशाला लोकशाहीचा मंत्र दिला आणि पंचायत राज संकल्पनेतून सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे तत्त्व सांगितले; मात्र जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात सध्या सत्तेच्या केंद्र्रीकरणाचा डाव रचला जात आहे. हा देश लोकशाहीतील राजांचा आहे की उद्योगपती अंबानी, अदानी अशा भांडवलदारांचा? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक गॅस, वायू, पाणी या राष्ट्रीय संपत्तीचे मालकी हक्क ठराविक उद्यागपतींना देऊन त्यांच्याकडून जनतेने ते विकत घेण्याची वेळ आली आहे.’यावेळी बाळासाहेब गोसावी, किरण साबळे-पाटील, धर्मराज घोरपडे, तात्या वाघमळे यांचीही भाषणे झाली. सभेस जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता चोरगे, पंचायत समितीच्या सदस्या सरिता इंदलकर, वसुंधरा ढाणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा समिंद्र्रा जाधव, राजेंद्र लवंगरे, आनंदा नलवडे उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक