शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

सातारा ‘रिपाइं’तील वाद उफाळला

By admin | Updated: August 28, 2014 22:20 IST

अशोक गायकवाडांवर टीका : तपासे गट राजीनामा देणार

सातारा : लोकसभा निवडणूक निकालानंतर धुमसत असलेला रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाच्या (खा. आठवले गट) जिल्हा कार्यकारिणतील वाद आता शिगेला पोहोचला आहे. जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांच्या समर्थकांनी पक्षाला राम-राम करण्याचा निर्णय घेतला आहे. खा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशारे तपासे आणि जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड असे ‘रिपाइं’चे दोन गट साताऱ्यात कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीत आठवले यांनी साताऱ्यातून गायकवाड यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. निकालानंतर तो आणखी वाढला. तपासे गटाचे नवनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड यांच्याकडून किशोर तपासे यांच्यावर लोकसभा निवडणुकीत काम केले नसल्याचा वारंवार आरोप केला आहे. तरीही आम्ही शांत होतो. मात्र, आता अतिरेक झाल्यामुळे आम्ही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.राजीनामे देणाऱ्यांत ‘रिपाइं’च्या भटक्या विमुक्त जमाती सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ शिंदे, मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा वायदंडे, रिपाइंचे कोषाध्यक्ष अण्णा उबाळे, मातंग आघाडीचे मारुती बोराटे, अल्पसंख्याक आघाडीचे फारूख पटनी, नितीन तुपे, मिलींद कांबळे, रवींद्र बाबर, महिला आघाडीच्या रेखा तपासे त्याचबरोबर अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)मी राजीनामे देऊन थकलो..!लोकसभा निवडणुकीत जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी त्रासाला कंटाळून एकदा नव्हे तर तब्बल दोनवेळा राजीनामा दिला. मात्र, तो खा. आठवले यांनी स्वीकारला नाही. तपासे गटाचे काही पदाधिकारी ओव्हाळ यांच्याकडे आपणही राजीनामा द्यावा, अशी विनंती करण्यासाठी गेले होते. ओव्हाळ यांनी मात्र या साऱ्यांपुढे हसतच ‘मी आता राजीनामा देऊन थकलो आहे. माझा राजीनामा कोणी स्वीकारत नाही. म्हणून त्यांना दु:ख झाले असेल..!‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी मात्र, तपासे गटाची खिल्ली उडविली आहे. ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत माझे कोणी काम केले नाही, असा आरोप मी कोणावरही केलेला नाही. ज्यांनी काम केले नसेल ते राजीनामे देणार असतील म्हणून मला वाईट वाटण्याचे कारण नाही. मी आरोप केला म्हणून त्यांनी राजीनामे देणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा, असेच मानावे लागेल.’आठवलेंसमवेत अकलूजला चर्चा‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले अकलूजच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी तपासे गटाला रात्री नऊ वाजता भेटीसाठी वेळ दिली होती. परिणामी तपासे गटाचे सर्व पदाधिकारी सातारा जिल्ह््यातून रात्री उशिरा अकलूजला रवाना झाले.