शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पालिकेविषयी नाराजी : भीमाबाई आंबेडकर वसाहतीत आंदोलनाचे वारे

By admin | Updated: February 2, 2015 23:49 IST

सध्या सार्वजनिक नळ कनेक्शन बंद केल्याने येथील वसाहतीत पाणीटंचाई भासू लागली आहे. नवीन चाळीतील घरे मिळेपर्यंत आमच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती

सातारा : सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकर वसाहतीतील नागरिकांना मागील १५ दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी देऊनही पालिका दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.भीमाबाई आंबेडकर वसाहतीत जवळपास ८० पेक्षा जास्त कुटुंबे राहतात. त्यांना येथील सार्वजनिक नळातून हौदाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु सध्या सार्वजनिक नळ कनेक्शन बंद केल्याने येथील वसाहतीत पाणीटंचाई भासू लागली आहे. नवीन चाळीतील घरे मिळेपर्यंत आमच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती; परंतु मागील १५ दिवसांपासून याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. अखेर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.आजमितीस येथील हातपंप व नगरपालिकेच्या सदर बझार येथील कार्यालयातून पाणी भरावे लागत आहे. रोजंदारी करून पोट भरणारे कामगार या वस्तीत सर्वाधिक असल्याने पाण्यासाठी पायपीट करून कामावर वेळेत जाणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे आम्हाला तातडीने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, सदर बझार परिसरातच जलवाहिनीला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. हे पाणी गटारांतून, रस्त्यावरून वाहत आहे. तेच पाणी नागरिकांना मिळाले, तरी बरे होईल, अशी भावना नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. एकीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)