शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

चर्चा अयशस्वी; घमासानच !

By admin | Updated: April 24, 2015 01:10 IST

उदयनराजे-बाळासाहेब ठाम : ‘जागेचा तह’ यशस्वी करण्यात ‘राम-लक्ष्मण’जोडी निष्प्रभ

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सांगावा घेऊन खासदार उदयनराजेंशी ‘जागेचा तह’ करण्यासाठी लक्ष्मणराव पाटील गुरुवारी सायंकाळी सातारच्या विश्रामगृहावर पोहोचले खरे; वीस मिनिटांच्या चर्चेनंतर लक्ष्मणतात्यांना ताटकळत ठेवून उदयनराजे थेट कऱ्हाडकडे रवाना झाले. तसेच आमदार बाळासाहेब पाटील हेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने कऱ्हाडात ठाण मांडून बसलेले विधान परिषद सभापती रामराजे व आमदार प्रभाकर घार्गे यांची रणनीतीही निष्प्रभ ठरली. दरम्यान, एक दिवस उरलेला असताना गुरुवारीसुद्धा एकही अर्ज मागे घेतला गेला नाही. राष्ट्रवादीतील पक्षाअंतर्गतचा तिढा अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत कायम राहिला. बारामतीकरांच्या फर्मानानुसार लक्ष्मणतात्यांनी स्वत: उदयनराजेंशी बोलण्यासाठी पुढाकार घेतला. गुरुवारी सकाळपासूनच लक्ष्मणतात्या उदयनराजेंनी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते; पण उदयनराजेंनी त्यांचे फोन स्वीकारले नाहीत. दुपार उलटून गेली तरी हा संपर्क काही केल्या होत नव्हता. अखेर पावणेपाचच्या दरम्यान हा संपर्क झाला. सायंकाळी सव्वापाच वाजता तात्यांनी विश्रामगृहावर येऊन उदयनराजेंशी कमराबंद चर्चा केली. लक्ष्मणतात्यांनी या बैठकीत उदयनराजेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही राष्ट्रवादीच्या पॅनेलसोबतच राहा,’ असा ज्येष्ठतेचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ‘मला बँकेतल्या तीन जागा पाहिजेत. बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाला,’ असे सांगून उदयनराजे तडकाफडकी उठले. ‘एका लग्नासाठी मला जावं लागतंय, तुम्ही बसा, मी परत आलोच,’ असं म्हणून उदयनराजे विश्रामगृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर सुमारे अर्धा तास लक्ष्मणतात्या विश्रामगृहातील एका दालनात बसून होते. उदयनराजेंचे समर्थक नाना शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी काही काळ तात्यांशी गप्पा मारल्या. त्यानंतर वाट पाहून-पाहून ‘मी निघतो. उदयनराजे परतल्यानंतर मला फोन करा, परत भेटतो,’ असं म्हणून तात्या तिथून निघून गेले. दरम्यान, गुरुवारी सकाळी रामराजेंसह, लक्ष्मणतात्या, आ. मकरंद पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, नागरी बँकेतील उमेदवार राजेश पाटील-वाठारकर यांनीही कऱ्हाडात आ. बाळासाहेब पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे उदयनराजे अन् बाळासाहेब यांच्याबाबतीतले दोन्ही प्रयत्न फोल ठरले.