शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कामचुकारांना शिस्त लावणार; पण गोडीगुलाबीनं!

By admin | Updated: October 6, 2015 00:22 IST

त्रुटी दूर करू : नूतन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांनी व्यक्त केला निर्धार

 सातारा : ‘कामचुकारांचं आधी गोड शब्दांत समुपदेशन, मग शाब्दिक इशारा, नंतर लेखी इशारा आणि सरतेशेवटी कारवाई, अशी कार्यशैली असेल,’ असे संकेत नूतन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांनी दिले आहेत. जिल्हा रुग्णालयातील त्रुटी आणि कमतरता भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.जिल्हा शल्यचिकित्सकपदाची सूत्रे डॉ. भोई यांनी नुकतीच हाती घेतली आहेत. त्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेची सद्य:स्थिती, कमतरता, त्रुटी, कार्यपद्धती याविषयी बोलते केले असता ते म्हणाले, ‘उपलब्ध मनुष्यबळ कमी आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची मोठ्या संख्येने गरज आहे. विविध विभागांमध्ये काही कमतरता प्रथमदर्शनी दिसत आहेत. या सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविला जाईल. तसेच उपलब्ध मनुष्यबळाकडून कामात कुचराई होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांचे आधी गोडीगुलाबीने समुपदेशन केले जाईल. टप्प्याटप्प्याने समज देत अखेर कारवाईचा बडगा उगारला जाईल.’जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात साठ रुग्णांची सोय आहे. परंतु सद्य:स्थितीत तेथे नव्वदपेक्षा जास्त रुग्ण आहेत. रेडिओलॉजीसह अनेक विभागांमध्ये तज्ज्ञांची कमतरता आहे. उपलब्ध यंत्रसामग्री हाताळण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असता डॉ. भोई म्हणाले, ‘सर्वच विभागांमध्ये काही ना काही कमतरता आहेत; त्रुटी आहेत. ट्रॉमा सेन्टरची योजना केंद्र सरकारची असल्यामुळे ती टप्प्याटप्प्याने उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत केवळ आठ ते नऊ ट्रॉमा सेन्टरची उभारणी पूर्ण झाली आहे. साताऱ्याचा नंबर कधी लागेल, तेव्हा लागेल; पण विभागवार अत्यावश्यक सुविधांची यादी तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी करण्यात येईल.’गर्भलिंगचिकित्सा रोखण्याच्या दृष्टीने ‘पीसीपीएनडीटी’ कारवाईसाठी सर्व सुविधा जिल्हा रुग्णालयाला पुरविण्यात आल्या आहेत. छुपे कॅमेरेही दिले आहेत. तरीही कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधले असता, आपल्या कारकिर्दीत अशा कारवाया होतील, याची हमी डॉ. भोई यांनी दिली. सीटी स्कॅनसारख्या सुविधांसाठी केवळ तंत्रज्ञांच्या अभावामुळे खासगी रुग्णालयात जावे लागू नये, या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मेडिकल कॉलेजबाबत माहिती घेऊसाताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव अनेक वर्षे धूळ खात पडून आहे. कधी जमिनीच्या कारणावरून तर कधी सरकारी आदेशामुळे हा प्रस्ताव मागेच पडला आहे. तो मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार का, असे विचारले असता डॉ. भोई म्हणाले, ‘याबाबत अंतिम निर्णय मंत्रालय पातळीवरच होईल. परंतु सध्याची परिस्थिती काय आहे, याची माहिती घेऊन प्रस्ताव मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल.’‘एमडी’ मिळतच नाहीतमनुष्यबळाची कमतरता हाच रुग्णसेवा पुरविण्यातील महत्त्वाचा अडथळा असल्याचे सांगून डॉ. भोई म्हणाले, ‘एमडी मेडिसिन आणि एमडी रेडिओलॉजी या संवर्गातील उमेदवार मिळतच नाहीत, अशी स्थिती आहे. सांगलीत आम्हाला हाच अनुभव आला. जाहिराती देऊनसुद्धा ही पदे रिक्तच राहतात. यावर उपाय शोधण्याची गरज आहे.’