शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

कोयनेतून ४९ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यातच धरणात ९० टीएमसीवर साठा ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यातच धरणात ९० टीएमसीवर साठा असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी सकाळी साडे पाच फुटांवरून दरवाजे ९ फुटांपर्यंत उचलण्यात आले. त्यामुळे ४७ हजार क्युसेक वेगाने पाणी विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेतून एकूण ४९ हजार ३४४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात धुवाँधार पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर तापोळा, बामणोली भागात धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर ओढे, नाले भरून वाहिल्याने कोयना धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. अवघ्या २४ तासांत साडे सोळा टीएमसी पाणी वाढण्याचाही विक्रम नोंद झाला. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत कोयना धरणातील साठा ९० टीएमसीच्या वर पोहोचला. त्यापूर्वीच धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू होता. पाऊस वाढल्यानंतर धरणाचे सहा दरवाजे १० फुटापर्यंत दरवाजे उचलण्यात आले होते. त्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने साडे पाच फुटांपर्यंत दरवाजे खाली घेण्यात आले. गेले पाच दिवस दरवाजे साडे पाच फुटांवर स्थिर होते. पण, पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, धरणातही आवक होत आहे. तसेच साठा ९० टीएमसीवर असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दरवाजे ९ फुटांपर्यंत उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे ९ फुटापर्यंत उघडण्यात आले. त्यामधून ४७,२४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पायथा वीजगृह २,१०० असा मिळून ४९,३४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात जात होता. यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढली आहे. पूर आल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील इतर धरणांतीलही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४३ मिलिमीटर पाऊस झाला. यावर्षी आतापर्यंत ३००७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला २० आणि जूनपासून आतापर्यंत ३,८२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४६ आणि आतापर्यंत ३,८८१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

चौकट :

जिल्ह्यातील धरणांतून होणारा विसर्ग

धोम धरणातून ४,०१२ क्युसेक विसर्ग सुरू होता. कण्हेर ४,०९४, बलकवडी ३८६, उरमोडी २,९१९ आणि तारळी धरणातून १,५३२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, धोम धरणात ७५.५८ टक्के पाणीसाठा झाला होता. कोयनेत ८५.२४, बलकवडी ८६.६६, उरमोडी धरण ७४.३५ आणि तारळी धरणात ८५.७० टक्के पाणीसाठा झाला होता.

...........................................................