शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खड्डेमुक्त अन् सोयीनीयुक्त महामार्ग लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:52 IST

चांगल्या रस्त्यांवरून प्रवास करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. टोल देऊनही असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या प्रवाशांना खड्डेमुक्त आणि सर्व सोयीनीयुक्त महामार्ग देण्यासाठी पूर्ण तयारी सुरू असून, पुढील दोन आठवड्यांत या रस्त्यांवरील गैरसोयी दूर करण्याचा शब्द रिलायन्सच्यावतीने ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आला.

सातारा : चांगल्या रस्त्यांवरून प्रवास करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. टोल देऊनही असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या प्रवाशांना खड्डेमुक्त आणि सर्व सोयीनीयुक्त महामार्ग देण्यासाठी पूर्ण तयारी सुरू असून, पुढील दोन आठवड्यांत या रस्त्यांवरील गैरसोयी दूर करण्याचा शब्द रिलायन्सच्यावतीने ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आला.

टोल विरोधी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते, रिलायन्सचे अधिकारी आणि याप्रश्नी न्यायालयात याचिका दाखल करणारे प्रवासी यांची एकत्र बैठक ‘लोकमत’ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी चळवळीचे प्रवर्तक रवींद्र नलवडे, महेश पवार, महारूद्र तिकुंडे, रोहित सपकाळ, महेश महामुनी, रिलायन्सच्यावतीने संकेत गांधी आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे अ‍ॅड. राजगोपाल द्रविड आणि अ‍ॅड. अमित द्रविड उपस्थित होते.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुर्दशा आणि त्यामुळे होणारे अपघात यांच्या विरोधात सोशल मीडियावर टोल विरोधी जनता ही चळवळ सामान्य सातारकरांनी सुरू केली. लोकहिताचे मुद्दे घेऊन सुरू झालेल्या या चळवळीला ‘लोकमत’ने खंबीर साथ देत विविध स्तरांवर हे प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न केले. ‘असुविधांचा महामार्ग’ नावाने सलग आठ दिवस खेडशिवापूर ते हुबळी महामार्गाची वस्तुस्थिती सांगणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केली. या वृत्तमालिकेमुळे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती झाली.टोल विरोधी जनता चळवळीच्यावतीने महामार्गावरील असुविधांचा पाढा वाचण्यात आला. महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून काम जैसे थे स्थितीत आहे. पावसाळ्यात फक्त खड्डेच होते, आता तर खड्डे आणि धूळ यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. महामार्गाला जुळणाऱ्या सेवारस्त्याला आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर नाहीत. त्यामुळे वेगाने येणाºया गाडीला वाहने दिसत नसल्याने अपघात होत असल्याची माहिती यावेळी टोल विरोधी जनता चळवळीच्या सदस्यांनी दिली. कित्येकदा अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध न होणं, तत्काळ सेवेसाठी संपर्क न होणं, टोल वसुलीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन आदी बाबी मांडण्यातआल्या.अ‍ॅड. राजगोपाल द्रविड यांनी टोलनाक्यावरून येणारी-जाणारी वाहने, गोळा होणारा टोल, त्या रकमेतून करण्यात येणारी देखभाल दुरुस्तीची कामे याविषयीची माहिती टोलनाक्यांवर स्पष्टपणे निर्देशित करण्याची सूचना मांडली. त्याबरोबरच स्वच्छतागृहांची अवस्था, सेवा रस्त्याची सोय या बाबी जर दिल्या तर टोल देण्यास कोणाचाच विरोध नाही; पण कोणत्याही सुविधा न देता केवळ टोल वसूल केला जात असेल तर आपण तो देणार नाही. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पुढील पंधरा दिवस ते महिनाभरात सुधारणा न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही द्रविड यांनी सांगितले.रिलायन्सच्यावतीने बाजू मांडताना संकेत गांधी यांनी पुढील पंधरा दिवसांत महामार्ग खड्डेमुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याबरोबरच येथून प्रवास करणाºयांनी रस्त्यावरील गैरसोयींबाबत तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करून भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासित केले. प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही प्रयत्न करत असून, पावसामुळे महामार्गाची दुरुस्ती करता येत नव्हती. आता युद्धपातळीवर काम सुरू झाले असून, महामार्गावर खड्डा राहणार नाही. त्याबरोबरच महामार्ग एका लेव्हलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यात फास्ट टॅगची व्यवस्था होत असल्यामुळे कोणालाही रांगेत उभे राहावे लागणार नाही. त्यामुळे वाद आणि इतर प्रसंग उद्भवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.