शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

जिल्हा बॅँकेत जुुन्या संचालकांनी बाजूला थांबावे !

By admin | Updated: February 7, 2015 00:16 IST

उदयनराजे : प्रस्थापितांनी लोकांच्या भावनेशी खेळणे थांबवावे, अन्यथा लोकांच्या सहनशीलतेचा अतिरेक होईल

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेत नव्यांना, तरुणांना संधी दिली गेली पाहिजे, याचा पुनरुच्चार केला. बँकेच्या सभासदांनीही यावेळी विद्यमान संचालकांना थांबण्यास सांगावे आणि नव्यांना संधी देण्याची विनंती करावी. मात्र, विद्यमान संचालक पुन्हा बँक निवडणुकीस उभे राहिले तर लोकांच्या हितासाठी व त्यांचा प्रतिनिधी म्हणून संचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी आपणास जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहावे लागेल. प्रस्थापितांनी लोकांच्या भावनेशी खेळणे थांबावावे, जर त्यांनी थांबवले नाही, तर लोकांचा अतिरेक होईल आणि त्यांच्या भावनांचा स्फोट होईल,’ असेही उदयनराजेंनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आणि विविध अधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्हा बँकेच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ‘सातारा जिल्ह्यातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. याबाबत निवेदने दिली, आंदोलने केली, निर्दशने केली. परंतु त्यातील काही प्रश्न तसेच आहेत. नवीन अधिकारी आले की त्यांना प्रश्न सांगायचे आणि कार्यवाही होण्याची वाट पाहायची हे ठरलेले आहे. तरीही मी जिल्ह्याच्या विविध प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत आशावादी आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. खासदारांनी विविध प्रश्नांबाबत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. दरम्यान, १२ फेब्रुवारीला मुंबईत बैठक असून, या बैठकीत प्रलंबित प्रश्नांपैकी अनेक प्रश्न सुटतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या बैठकीत पहिला प्रश्न त्यांनी आंबेडकरांच्या स्मारकांचा मांडला. यावेळी विविध दलित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)....तर आमने-सामने होऊन जाऊ दे!‘लोकांच्या प्रश्नांसाठी मी आतापर्यंत लढत आलो असून, इतर लोकप्रतिनिधींपेक्षा जास्त केसेस माझ्यावर आहेत. मला जे प्रश्न विचारतात, ते प्रश्न त्यांनाही विचारा आणि ते जर उत्तर देणार नसतील तर एकदा आमने-सामने होऊन जाऊ दे. मी तर काही ‘अतिरिक्त’ आहे ना,’ असा टोलाही त्यांनी रामराजेंचे नाव न घेता लगावला.उदयनराजेंनी या केल्या मागण्यागुंडांच्या संपत्तीची चौकशी करावीपोलीस अधीक्षकांना मेट्रोपॉलिटिन शहराप्रमाणे कमिशनरचे अधिकार द्यावेजिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरवस्था दूर करासाताऱ्यातील आय.टी.आय मधील कोर्सेसची पुनर्रचना करावीमहाबळेश्वर, पाचगणीतील अनधिकृत बांधकामेमहाबळेश्वर येथील वाहतुकीचा प्रश्न मिटवावाकऱ्हाड येथील कचऱ्याच्या प्रकल्पावरील स्थगिती उठवावीउरमोडीजवळचे क्रशर बंद करावेटेंभू योजनेचे पाणी अडवू नये