शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

थेट संपर्क ‘डमी मशीनद्वारे’

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

ग्रामपंचायत निवडणूक : चिन्ह पोहोचण्यासाठी उमेदवारांची युक्ती

खंडाळा : सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची पूर्वतयारी म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. त्यामुळेच गावागावांत इच्छुकांनी मोर्चेबांधणी करून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका बॅलेट मशीनद्वारे होणार असल्याने लोकांपर्यंत प्रचार कसा पोहोचवायचा, असा प्रश्न नेत्यांसह कार्यकर्त्यांना पडला आहे. पण, यावर उपाय म्हणून बाजारात डमी मशीन उपलब्ध झाल्या असून, आता गावोगावी बझर ऐकु येत आहे.ग्रामपंचायतीसाठी एका वार्डात एका पॅनेलचे तीन उमेदवार असतात. यापूर्वी वार्डातील तिन्ही उमेदवारांना वेगवेगळ्या रंगांच्या चिठ्ठ्या देऊन एक निवडणूक चिन्ह दिले जायचे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना आमक्या रंगाच्या चिठ्ठीवर या चित्रांवर शिक्का मारा ‘असा’ प्रचार करणे सोपे जायचे. मात्र, प्रशासनाच्या सोयीसाठी लोकसभेपासून सर्वत्र निवडणुका बॅलेट मशीनद्वारे घेण्यास सुरुवात झाली. त्याचे लोन आता ग्रामपंचायतीपर्यंत येऊन पोहोचले आहे. वार्डातील उमेदवार एकाच बॅलेटवर असणार आहेत. बॅलेटवरच रंगांच्या स्ट्रीपवर उमेदवारांची नावे छापून बटण दाबायचे. परंतु मतदाराने एकाच उमेदवाराचे बटण दोनदा किंवा तीनदा दाबू नये, यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी डमी मशीनद्वारे प्रचार करणे अधिक सोयीचे जावे, यासाठी काही तरुण उद्योजकांनी या मशीन बाजारात उपलब्ध केल्या आहेत. मशीन खरेदीसाठी उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले. एका मशीनवर तीन उमेदवारांना मतदान कसे करणार, असा संभ्रम लोकांच्या मनात आहे. (प्रतिनिधी)