शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

अवकाळीमुळे जिल्ह्यातील ८५० हेक्टरवरील पिकांवर अवकळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका नजरअंदाजे ८५० हून अधिक हेक्टरला बसला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका नजरअंदाजे ८५० हून अधिक हेक्टरला बसला आहे. यामध्ये कमी-अधिक फरकाने सुमारे १७०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तर सध्या पंचनाम्याचे काम सुरू असून बुधवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नुकसान क्षेत्राचा आकडा समोर येणार आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाला, पण पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात गाराही पडल्या. यामुळे पिके आणि फळांचे नुकसान झाले. या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत नजरअंदाजे ८५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर १ हजार ७४० शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील खटाव तालुक्यात सर्वाधिक पीक नुकसान झालेले क्षेत्र आहे. या तालुक्यात नजरअंदाजे नुकसान क्षेत्र ७७९ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारी आणि गहू पिकाचेच नुकसान झालेले आहे. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १ हजार ५६२ आहे. फलटण तालुक्यात अंदाजे ४८ हेक्टरचे नुकसान आहे, तर शेतकऱ्यांचा आकडा १०७ आहे. या तालुक्यातही ज्वारी आणि गहू पिकांचेच नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर वाई तालुक्यात २५ हेक्टर क्षेत्र बाधित असून शेतकऱ्यांची संख्या ४८ आहे. वाई तालुक्यातही ज्वारी आणि गव्हालाच फटका बसलाय. कोरेगाव तालुक्यात ४.५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान आहे, तर महाबळेश्वर तालुक्यात २ हेक्टरवरील स्ट्रॉबेरी फळाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

कोट :

जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे नजरअंदाजे समोर आले आहे. बुधवारपर्यंत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर खऱ्याअर्थाने पीक नुकसानीचा आकडा समोर येईल.

- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा

.......................................................