शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अटलजींबरोबर बसून जेवणाचा योग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:53 PM

सातारा : आपल्या काव्यमधूर बोलण्यातून सोबत येणाऱ्यावर गारुड घालणाºया अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत जवळ बसून भोजन करण्याची संधी जावळी तालुक्यातील आनेवाडी गावचे निवृत्त शिक्षकव भाजपचे त्या काळातील प्रचारक मधू पवार यांना मिळाला होता. ‘सतारा से आए हो तो डट केखाओ,’ असंही अटलजी त्यांना म्हणाले होते.सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा ...

सातारा : आपल्या काव्यमधूर बोलण्यातून सोबत येणाऱ्यावर गारुड घालणाºया अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत जवळ बसून भोजन करण्याची संधी जावळी तालुक्यातील आनेवाडी गावचे निवृत्त शिक्षकव भाजपचे त्या काळातील प्रचारक मधू पवार यांना मिळाला होता. ‘सतारा से आए हो तो डट केखाओ,’ असंही अटलजी त्यांना म्हणाले होते.सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढलेले व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम पाहिलेले आनेवाडी गावचे मधू पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या.तुम्ही भाजपचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले आहे. अटलजींसोबतच्या आठवणी काही आहेत का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेशमध्ये गेलो होतो. तेव्हा एका कार्यकर्त्याच्या घरी भोजनाची व्यवस्था केली होती. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष असणाºया अटलबिहारी वाजपेयी यांनाही येथे निमंत्रण होते. एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असणाºया या नेत्याचा कुठलाही बडेजाव नव्हता. मोजकेच कार्यकर्ते सोबत असायचे. अटलजी, त्यांच्या कुटुंबातील मोजके दोघे सदस्य आणि मी स्वत: असे चौघेच डायनिंग टेबलावर जेवायला बसलो होतो. अटलजींच्या शेजारच्या खुर्चीवर बसून मी जेवलो. ही आठवण अजूनही ताजी आहे.’दरम्यान, साताºयातील आठवण सांगताना पवार म्हणाले, ‘जनसंघाच्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेतील नोकरी सोडून वसंतदादांच्याविरोधात सातारा-सांगली विधानपरिषदेची निवडणूक लढवली. त्यानंतर जिल्हा बँकेत तत्कालीन संचालकांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात मी राजवाड्यावरील गांधी मैदानावर उपोषणाला बसलो होतो. त्याच कालावधीत अटलजींची मुंबईत सभा सुरू होती. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मी साताºयात उपोषणाला बसलो होतो, त्याची कोणीतरी अटलजींना माहिती दिली.आपल्या भाषणात तेव्हा त्यांनी ‘उधर सतरा में भ्रष्टाचार के खिलाफ हमारा मधू पवार नामका कार्यकर्ता लढ रहा है,’ असा उल्लेख केला होता.वाईत अटलबिहारी वाजपेयी यांची जाहीर सभा झाली होती, तेव्हा सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचेही पवार यांनी सांगितले. तसेच कुठल्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवणाºया तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही अटलजींच्या सांगण्यावरून व्यासपीठावर येण्याचे मान्य केले होते, असेही पवार यांनी सांगितले. जगात शांतता राहण्यासाठी राजा हा तत्वज्ञ असला पाहिजे, असे प्लुटो म्हणायचा. अटलजींच्या बाबतीत हे तत्त्वज्ञान सार्थठरणारे आहे, असेही पवार यांनी सांगितले.भारत मेरे लिए केवलजमीन का टुकडा नही७० च्या दशकात जनसंघाच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौºयावर आले होते. त्यावेळी त्यांनी श्री हनुमान जयंतीच्या दिवशी साताºयातील गांधी मैदानावर एक सभा घेतली होती. या सभेच्या शेवटी ‘भारत मेरे लिए केवल जमीन का टुकडा नही ये जिता जागता राष्ट्रपुरुष है....’अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर ते वडूज, वाई, पाचगणी आणि लोणंद येथील कार्यक्रमालाही उपस्थित राहिले होते. तसेच कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली होती.