शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

साताऱ्यात धो-धो; पश्चिमेकडे दाणादाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाने हाहाकार माजवला असून साताऱ्यात धो-धो सुरू होता. तर पश्चिम भागात दाणादाण उडवून दिली ...

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाने हाहाकार माजवला असून साताऱ्यात धो-धो सुरू होता. तर पश्चिम भागात दाणादाण उडवून दिली आहे. यामुळे अनेक ठिकाणी भूसख्खलन झाले आहे. वाहून गेलेल्या व अडकलेल्या नागरिकांसाठी शोधकार्य सुरू आहे. तर २४ तासांत नवजाला विक्रमी ७४६ तर कोयनेला ६१० मिलीमीटर पाऊस झाला. कोयनेत १६ टीएमसी पाणीसाठा वाढला असून धरणाचे सर्व ६ दरवाजे १० फूट उचलून ४१ हजार क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पण, चार दिवसांपासून धुवाधार होत आहे. पश्चिम भागाला तर झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर दरडी कोसळत आहेत. पूल वाहून गेले. त्याचबरोबर रस्ते तुटले आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागातील प्रमुख मार्गही बंद आहेत. तर वाई आणि पाटण तालुक्यात भूसख्खलनाच्या घटना घडल्या. यामध्ये काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शोध कार्य सुरू करण्यात आले आहे. तर पुराच्या पाण्यात काही जण वाहून गेले आहेत. सततच्या पावसामुळे मदतकार्यातही अडथळा येत आहे. तरीही जिल्हा प्रशासन सतर्कता ठेवून शक्य तेवढ्या प्रमाणात मदत देण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, कोयना, नवजा, महाबळेश्वर, पाटण, तापोळा, बामणोली भागात धुवाधार पाऊस होत आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत नवजाला ७४६ मिलीमीटर, कोयनेला ६१० आणि महाबळेश्वरला ५५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना धरणात २४ तासांत १६ टीएमसीहून अधिक साठा झाला. सकाळच्या सुमारास धरणात ८२.९८ टीएमसी साठा झाला होता. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळपासून धरणाचे दरवाजे यावर्षी प्रथमच उघडण्यात आले. दुपारी २ च्या सुमारास धरणाचे दरवाजे १० फूट उचलून ४१,६९३ क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू होता. तर पायथा वीजगृहातीलही २१०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. यामुळे धरणातून एकूण ४३,७९३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात जात होता. यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे.

चौकट :

धरणांतील विसर्ग असा (सकाळी आठची आकडेवारी

धोम- ३७७१, कण्हेर- ६७४४, उरमोडी ४३८३, तारळी ११३९४. बलकवडी ६४५८.