शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

धनगर समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात येणे काळाची गरज : काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST

वडूज : ‘धनगर समाजाने स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात येणे काळाची गरज ...

वडूज : ‘धनगर समाजाने स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात येणे काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले.

सातेवाडी येथे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सागर डोंबाळे यांची महासंघाच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नियुक्तीपत्र देण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. दिलीप बरकडे होते. यावेळी माजी सरपंच हनुमंत कोळेकर उपस्थित होते.

काकडे म्हणाले, ‘धनगर समाजाला सातत्याने राजकीय नेते मंडळींनी झुलवत ठेवल्यामुळे समाजाची प्रगती होऊ शकली नाही. त्यासाठी धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्गाने व युवक वर्गाने एकत्र येऊन समाजामध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. धनगर समाजातील अनिष्ट चालीरिती बंद करून समाजाने शैक्षणिक प्रवाहात आल्यानंतरच समाजाची प्रगती होईल. धनगर समाजाचा सर्वच राजकीय नेतेमंडळींनी व पक्षांनी राजकारणापुरता गैरफायदा घेतला आहे. धनगर समाजाला सर्व क्षेत्रातून संपवण्याचे षड्यंत्र केले जात आहे.’

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू लोखंडे, स्वामी डोंबाळे, संतोष काळे, डॉ. महेश माने, हेमंत कोळेकर, अजित काळे, दादासाहेब डोंबाळे, दत्तात्रेय कोळेकर, विक्रम काळे, समीर गोरड, समीर काळे, प्रल्हाद डोंबाळे, राहुल डोंबाळे, दीपक डोंबाळे, सुरेश डोंबाळे, जालिंदर डोंबाळे, नाना शिंगटे, दत्तात्रय कचरे, विठ्ठल डोंबाळे, रामभाऊ काळे, आनंदराव डोंबाळे, महादेव पाटोळे, गणेश डोंबाळे, अर्जुन काळे उपस्थित होते.