शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

धनगर समाजातर्फे सरकार विरोधात जागरण गोंधळ : फलटणमध्ये एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:07 IST

धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने येथील अधिकारगृह इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देआंदोलनाच्या सातव्या दिवशी घोषणाबाजी

फलटण : धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने येथील अधिकारगृह इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलनस्थळी शनिवारी धनगर समाज बांधवांनी राज्य सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ घातला.

धनगर समाजाला घटनेने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हणमंतराव सूळ यांनी धरणे आंदोलनास भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी हणमंतराव सूळ म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला. परंतु तत्कालीन राज्यकर्त्यांनी जाणून बुजून या आरक्षणापासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. या सरकारने त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. ती त्वरित मान्य होईल ही अपेक्षा या सरकारकडून व्यक्त करू या. धनगर समाज बांधवांचे बेमुदत आंदोलन शहरात गेले सात दिवस सुरू आहे. हे आंदोलन समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने करावे. कुठलाही अनुचित प्रकार करून शासनाच्या मालमत्तेचे हानी होईल, असे कृत्ये करू नये.’

या आंदोलनास बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गुलाबराव देवकाते, संस्थेच्या तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.

आपल्या राज्यात ९३ हजार धनगड असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्ष जिल्हा व तालुक्याची नावे सांगितली जात नाहीत त्यातच आपल्या जिल्हात २७५ धनगड असल्याचे शासकीय स्तरावरून सांगितले जाते; पण ते नेमके कोठे आहेत ही बाब लपविली जात असल्याचे समाज बांधवांनी याप्रसंगी निर्देशित केले.धनगर समाज आरक्षण आंदोलनालाखंडाळ्यात सर्वपक्षीय पाठिंबाखंडाळा : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, यासाठी खंडाळा तहसील कार्यालयावर सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत आहे. आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवून सरकार दरबारी समाजाच्या भावना पोहोचविण्याचा शनिवारी निर्धार करण्यात आला.

खंडाळा येथे धनगर समाज बांधवांनी आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. त्यास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कोणाच्या बापाचं’ आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.

धरणे आंदोलनाच्या पहिल्याच रात्री भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करून आंदोलनाला बळ देण्यात आले. खंडाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव टप्प्याटप्प्याने आंदोलनात सहभागी होणार आहेत.