शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

धनगर समाजातर्फे सरकार विरोधात जागरण गोंधळ : फलटणमध्ये एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:07 IST

धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने येथील अधिकारगृह इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देआंदोलनाच्या सातव्या दिवशी घोषणाबाजी

फलटण : धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने येथील अधिकारगृह इमारतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलनस्थळी शनिवारी धनगर समाज बांधवांनी राज्य सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ घातला.

धनगर समाजाला घटनेने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हणमंतराव सूळ यांनी धरणे आंदोलनास भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी हणमंतराव सूळ म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला. परंतु तत्कालीन राज्यकर्त्यांनी जाणून बुजून या आरक्षणापासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. या सरकारने त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. ती त्वरित मान्य होईल ही अपेक्षा या सरकारकडून व्यक्त करू या. धनगर समाज बांधवांचे बेमुदत आंदोलन शहरात गेले सात दिवस सुरू आहे. हे आंदोलन समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने करावे. कुठलाही अनुचित प्रकार करून शासनाच्या मालमत्तेचे हानी होईल, असे कृत्ये करू नये.’

या आंदोलनास बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गुलाबराव देवकाते, संस्थेच्या तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.

आपल्या राज्यात ९३ हजार धनगड असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्ष जिल्हा व तालुक्याची नावे सांगितली जात नाहीत त्यातच आपल्या जिल्हात २७५ धनगड असल्याचे शासकीय स्तरावरून सांगितले जाते; पण ते नेमके कोठे आहेत ही बाब लपविली जात असल्याचे समाज बांधवांनी याप्रसंगी निर्देशित केले.धनगर समाज आरक्षण आंदोलनालाखंडाळ्यात सर्वपक्षीय पाठिंबाखंडाळा : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, यासाठी खंडाळा तहसील कार्यालयावर सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत आहे. आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवून सरकार दरबारी समाजाच्या भावना पोहोचविण्याचा शनिवारी निर्धार करण्यात आला.

खंडाळा येथे धनगर समाज बांधवांनी आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. त्यास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कोणाच्या बापाचं’ आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.

धरणे आंदोलनाच्या पहिल्याच रात्री भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करून आंदोलनाला बळ देण्यात आले. खंडाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव टप्प्याटप्प्याने आंदोलनात सहभागी होणार आहेत.