शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

पालिका हद्दीत समावेश झाल्यास उपनगरांचा विकास

By admin | Updated: July 10, 2015 22:07 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : विकासासाठी हद्दवाढही गरजेची

सातारा : सातारा शहरालगत असलेल्या उपनगरांचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र, त्याप्रमाणात उपनगरांचा विकास होत नसल्याने तेथे राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या मानाने उपनगरांच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. उपनगरांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपनगरांचा समावेश पालिका हद्दीत होणे आवश्यक आहे. उपनगरांच्या विकासासाठी हद्दवाढ हाच एकमेव पर्याय आहे, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरालगत शाहुपूरी, शाहूनगर आदी उपनगरे वसली आहेत. या उपनगरांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मात्र या उपनगरांमध्ये रस्ते, पाणी, पथदिवे, कचरा आदी समस्या सातत्याने भेडसावत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न केला. मात्र उपनगरांच्या विकासासाठी शासनाकडून भरीव निधी मिळत नाही. या उपनगरांना बाजारहाट, आरोग्य, दळणवळ आदी दैनंदीन बाबींसाठी सातारा शहरावरच अवलंबून रहावे लागते. उपनगरात कचऱ्याची मोठी समस्या असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीही पालिकेवर अवलंबून रहावे लागते. निधी अभावी उपनगरातील रस्त्यांची मोठ्याप्रमाणात दुर्दशा झाली आहे. गटारे, पथदिव्यांची वाणवा आहे. आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत रस्त्यांचा मुद्दा पुढे करुन काही लोकांनी हद्दवाढीला विरोध केला होता. मात्र आता सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. पावसाळ्यांनतर शहरातील उर्वरीत सर्व रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. झोपडपट्टी मुक्त शहरासाठी पालिकेने घरकुल योजना राबवली आहे. त्याचप्रकारे उपनगरांचा विकास झाला पाहिजे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)उपनगरांना दर्जेदार सोयी, सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढ होणे आवश्यक आहे. याची जाणीव उपनगरातील नागरिकांना असून हद्दवाढीला नागरिकांचा विरोध नाही. मात्र, आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या खोट्या आशेपायी काही लोक उपनगरांना विकासापासून वंचीत ठेवत आहेत.हद्दवाढीसाठी आपण मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही हद्दवाढीबाबत चर्चा केली आहे.- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार