शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

देसार्इंचे ‘साडू’; कदमांचे ‘पाहुणे’! उदयदादांच्या डोक्यात चाललंय काय? राजकीव वर्तुळात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:07 IST

प्रमोद सुकरे । कऱ्हाड : गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कऱ्हाडातील शस्त्रपूजनाला अ‍ॅड. उदयसिंह पाटलांनी हजेरी लावली. अनेकांच्या भुवया त्यामुळे ...

ठळक मुद्देही चर्चा अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही.हर्षद कदमांनी तीन दिवस कोयना महोत्सवाचे आयोजन केले होते

प्रमोद सुकरे ।कऱ्हाड : गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कऱ्हाडातील शस्त्रपूजनाला अ‍ॅड. उदयसिंह पाटलांनी हजेरी लावली. अनेकांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या. आता तर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी मल्हारपेठ, ता. पाटण येथे आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाला उदयसिंह पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सध्या काँगे्रस अंतर्गत संघर्षामुळे पक्षापासून सुरक्षित अंतरावर असलेल्या उदयसिंह यांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

अ‍ॅड. उदय पाटील यांना माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा आहे. मात्र, गत विधानसभा निवडणुकीला काँगे्रसने विलासकाकांना उमेदवारी नाकारल्याने त्यांना बंडाचा झेंडा हाती घ्यावा लागला. त्यावेळपासून काँगे्रस पक्ष आणि उंडाळकर यांच्यात पडलेले अंतर अजूनही कमी झालेले दिसत नाही. विधानसभेनंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाही उंडाळकर गटाने रयत आघाडीच्या माध्यमातून लढविल्या.

विलासराव पाटील-उंडाळकरांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची सप्तपदी पूर्ण करीत एक इतिहास रचला; पण त्यांचे वारसदार असणाऱ्या उदयसिंह पाटलांच्या भावी वाटचालीत अनेक अडचणी दिसतात. त्यातील पहिली अडचण म्हणजे काँगे्रस पक्षापासून असणारे अंतर मानावे लागेल. पृथ्वीबाबांनी तर मी कºहाड दक्षिणमधूनच लढणार असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. पुतणे अ‍ॅड. आनंदराव पाटील अगोदरच राष्ट्रवादीत जाऊन बसले आहेत. अशा परिस्थितीत उंडाळकर पिता-पुत्र काही नव्या खेळी खेळतील का? काही नवी चाचपणी करतील का? याकडे साºयांचे लक्ष आहे. त्यामुळेच ते संघाच्या कार्यक्रमाला गेल्यावर जशा उलट-सुलट चर्चा झाल्या. त्याच पद्धतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी लावलेली हजेरी चर्चेची ठरली आहे.बाळासाहेबांच्या मांडीला मांडीकाँगे्रसला कºहाड पंचायत समितीत सत्तेपासून दूर ठेवायचे, अशी खूणगाठ बांधलेल्या उदयसिंह पाटलांनी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मांडीला मांडी लावली. आता तर विधानसभेच्या तोंडावर सभापतिपदही आपल्या गटाच्या पारड्यात त्यांनी पाडून घेतलंय. चार दिवसांपूर्वी कºहाडात एका वाढदिवाच्या कार्यक्रमात बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील एकत्रित होते.पृथ्वीबाबांच्या बरोबरही हजेरीकाही महिन्यांपूर्वी एका इफ्तार पार्टीलाही पृथ्वीबाबा, आनंदराव नाना अन् उदयसिंह पाटील एकत्रित दिसले होते. त्याबरोबर तालुक्यातील एका विकाससेवा सोसायटीने आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनही पृथ्वीबाबा अन् उदयसिंह पाटलांनी एकत्रित केले होते. त्यावेळपासून सुरू झालेली चव्हाण आणि उंडाळकर गट एकत्रित येणार, ही चर्चा अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही...अन् टाळ्यांचा कडकडाट झालाहर्षद कदमांनी तीन दिवस कोयना महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनाला उदयसिंह पाटील यांना खास निमंत्रण दिले होते. मग उदयसिंह पाटीलही कोयनेचे पेढे घेऊन कार्यक्रमाला हजर झाले. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर स्वागत करताना कदमांनी पाटलांच्या खांद्यावर भगवी शाल पांघरली अन् उपस्थितांच्यातून टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर