शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

देसार्इंचे ‘साडू’; कदमांचे ‘पाहुणे’! उदयदादांच्या डोक्यात चाललंय काय? राजकीव वर्तुळात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:07 IST

प्रमोद सुकरे । कऱ्हाड : गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कऱ्हाडातील शस्त्रपूजनाला अ‍ॅड. उदयसिंह पाटलांनी हजेरी लावली. अनेकांच्या भुवया त्यामुळे ...

ठळक मुद्देही चर्चा अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही.हर्षद कदमांनी तीन दिवस कोयना महोत्सवाचे आयोजन केले होते

प्रमोद सुकरे ।कऱ्हाड : गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कऱ्हाडातील शस्त्रपूजनाला अ‍ॅड. उदयसिंह पाटलांनी हजेरी लावली. अनेकांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या. आता तर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी मल्हारपेठ, ता. पाटण येथे आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाला उदयसिंह पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सध्या काँगे्रस अंतर्गत संघर्षामुळे पक्षापासून सुरक्षित अंतरावर असलेल्या उदयसिंह यांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

अ‍ॅड. उदय पाटील यांना माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा आहे. मात्र, गत विधानसभा निवडणुकीला काँगे्रसने विलासकाकांना उमेदवारी नाकारल्याने त्यांना बंडाचा झेंडा हाती घ्यावा लागला. त्यावेळपासून काँगे्रस पक्ष आणि उंडाळकर यांच्यात पडलेले अंतर अजूनही कमी झालेले दिसत नाही. विधानसभेनंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाही उंडाळकर गटाने रयत आघाडीच्या माध्यमातून लढविल्या.

विलासराव पाटील-उंडाळकरांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची सप्तपदी पूर्ण करीत एक इतिहास रचला; पण त्यांचे वारसदार असणाऱ्या उदयसिंह पाटलांच्या भावी वाटचालीत अनेक अडचणी दिसतात. त्यातील पहिली अडचण म्हणजे काँगे्रस पक्षापासून असणारे अंतर मानावे लागेल. पृथ्वीबाबांनी तर मी कºहाड दक्षिणमधूनच लढणार असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. पुतणे अ‍ॅड. आनंदराव पाटील अगोदरच राष्ट्रवादीत जाऊन बसले आहेत. अशा परिस्थितीत उंडाळकर पिता-पुत्र काही नव्या खेळी खेळतील का? काही नवी चाचपणी करतील का? याकडे साºयांचे लक्ष आहे. त्यामुळेच ते संघाच्या कार्यक्रमाला गेल्यावर जशा उलट-सुलट चर्चा झाल्या. त्याच पद्धतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी लावलेली हजेरी चर्चेची ठरली आहे.बाळासाहेबांच्या मांडीला मांडीकाँगे्रसला कºहाड पंचायत समितीत सत्तेपासून दूर ठेवायचे, अशी खूणगाठ बांधलेल्या उदयसिंह पाटलांनी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मांडीला मांडी लावली. आता तर विधानसभेच्या तोंडावर सभापतिपदही आपल्या गटाच्या पारड्यात त्यांनी पाडून घेतलंय. चार दिवसांपूर्वी कºहाडात एका वाढदिवाच्या कार्यक्रमात बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील एकत्रित होते.पृथ्वीबाबांच्या बरोबरही हजेरीकाही महिन्यांपूर्वी एका इफ्तार पार्टीलाही पृथ्वीबाबा, आनंदराव नाना अन् उदयसिंह पाटील एकत्रित दिसले होते. त्याबरोबर तालुक्यातील एका विकाससेवा सोसायटीने आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनही पृथ्वीबाबा अन् उदयसिंह पाटलांनी एकत्रित केले होते. त्यावेळपासून सुरू झालेली चव्हाण आणि उंडाळकर गट एकत्रित येणार, ही चर्चा अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही...अन् टाळ्यांचा कडकडाट झालाहर्षद कदमांनी तीन दिवस कोयना महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनाला उदयसिंह पाटील यांना खास निमंत्रण दिले होते. मग उदयसिंह पाटीलही कोयनेचे पेढे घेऊन कार्यक्रमाला हजर झाले. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर स्वागत करताना कदमांनी पाटलांच्या खांद्यावर भगवी शाल पांघरली अन् उपस्थितांच्यातून टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर