शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

शहीद जवानाच्या कुटुंबीयांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 04:36 IST

सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे.

मुंबई : सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे. सरकार दरबारी मात्र शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर मदत निधीची रक्कम मिळवताना वणवण होत आहे.सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मस्करवाडी, कुकडवाड येथील सुनील विठ्ठल सूर्यवंशी हे २०१०मध्ये सैन्यात दाखल झाले. सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात १० फेब्रुवारी २०१६ रोजी बर्फाचा कडा कोसळून दहा जवानांनी वीरमरण पत्करले. सियाचीनचा प्रदेश अत्यंत दुर्गम आणि मानवी क्षमतेची कसोटी घेणारा असतो. या घटनेत मस्करवाडीचे सुनील सूर्यवंशीही शहीद झाले. देशसेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे साडेआठ लाखांची मदत केली जाते.सैनिक कल्याण खातेसंभाजीराव निलंगेकर-पाटील मंत्री असलेले सैनिक कल्याण खाते राज्यात कमालीचे सुस्त बनलेले आहे. वास्तविक, राज्य सरकारांकडून शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी मदत केंद्राकडून राज्याला परत मिळते. असे असूनही सैनिकांच्या कुटुंबीयांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्यातील समस्त जवानांच्या कुटुंबीयांमध्ये राज्य सरकारबद्दल नाराजीची भावना आहे.मुख्यमंत्र्यांची ‘ती’ माहितीवरळीत ३१ जानेवारी रोजी ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ या जवानांच्या सन्मानार्थ झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पूर्वी सरकारकडून साडेआठ लाख रुपये दिले जायचे, आम्ही २० लाख देतोय, यापुढे २५ लाख देऊ’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करSatara areaसातारा परिसर