शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शहीद जवानाच्या कुटुंबीयांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 04:36 IST

सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे.

मुंबई : सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे. सरकार दरबारी मात्र शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर मदत निधीची रक्कम मिळवताना वणवण होत आहे.सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मस्करवाडी, कुकडवाड येथील सुनील विठ्ठल सूर्यवंशी हे २०१०मध्ये सैन्यात दाखल झाले. सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात १० फेब्रुवारी २०१६ रोजी बर्फाचा कडा कोसळून दहा जवानांनी वीरमरण पत्करले. सियाचीनचा प्रदेश अत्यंत दुर्गम आणि मानवी क्षमतेची कसोटी घेणारा असतो. या घटनेत मस्करवाडीचे सुनील सूर्यवंशीही शहीद झाले. देशसेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे साडेआठ लाखांची मदत केली जाते.सैनिक कल्याण खातेसंभाजीराव निलंगेकर-पाटील मंत्री असलेले सैनिक कल्याण खाते राज्यात कमालीचे सुस्त बनलेले आहे. वास्तविक, राज्य सरकारांकडून शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी मदत केंद्राकडून राज्याला परत मिळते. असे असूनही सैनिकांच्या कुटुंबीयांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्यातील समस्त जवानांच्या कुटुंबीयांमध्ये राज्य सरकारबद्दल नाराजीची भावना आहे.मुख्यमंत्र्यांची ‘ती’ माहितीवरळीत ३१ जानेवारी रोजी ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ या जवानांच्या सन्मानार्थ झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पूर्वी सरकारकडून साडेआठ लाख रुपये दिले जायचे, आम्ही २० लाख देतोय, यापुढे २५ लाख देऊ’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करSatara areaसातारा परिसर