शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विद्यापीठातील कॅशलेस सुविधेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:12 IST

< p >कोल्हापूर : ‘कॅशलेस’ व्यवहारासाठीची सुविधा बंद असल्याने प्रवेशासह विविध स्वरूपांतील शुल्काचे चलन करताना ‘कार्ड नको, तर रोख पैसे भरा’ असे शिवाजी विद्यापीठात सांगितले आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार कॅशलेस व्यवहारासाठी आॅनलाईन पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनची सुविधा ...

<p>कोल्हापूर : ‘कॅशलेस’ व्यवहारासाठीची सुविधा बंद असल्याने प्रवेशासह विविध स्वरूपांतील शुल्काचे चलन करताना ‘कार्ड नको, तर रोख पैसे भरा’ असे शिवाजी विद्यापीठात सांगितले आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार कॅशलेस व्यवहारासाठी आॅनलाईन पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनची सुविधा विद्यापीठ प्रशासनाने उपलब्ध करून दिली. या सुविधांची सुरुवात केल्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील १०७ क्रमांकाच्या खोलीमध्ये विविध स्वरूपांतील शुल्काचे चलन भरून घेताना डेबिट, क्रेडिट कार्डची सक्ती करण्यात आली. पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनच्या सुविधेबाबत विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांतूनही कॅशलेस सुविधेचे स्वागत करण्यात आले. मात्र, अचानकपणे गेल्या काही दिवसांपासून चलनासाठी कॅशलेस सुविधेच्या वापराऐवजी रोख पैसे भरण्यास सांगितले जात आहे. प्रवेश प्रक्रियेची धावपळ सुरू असतानाच कॅशलेस सुविधा बंद असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. कॅशलेस व्यवहाराची सुविधा पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबतची माहिती घेऊन वित्त व लेखाधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे सांगितले.ऐनवेळी एटीएमची शोधाशोधसध्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांची काही प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, मायग्रेशन प्रमाणपत्र, आदी मिळविण्याची धावपळ सुरू आहे. अशा स्थितीत शुल्क हे कार्डद्वारे स्वीकारले जाते, अशी विद्यार्थ्यांना माहिती आहे. त्यानुसार मुख्य इमारतीमधील १०७ क्रमांकाच्या खोलीमध्ये चलन करण्यासाठी विद्यार्थी येतात.चलन करण्याच्या रांगेत थांबल्यानंतर काउंटरवर येताच त्यांना ‘कार्ड चालणार नाही, रोख पैसे द्या’ असे सांगितले जात आहे. कार्ड असल्याने शक्यतो अनेकजण रोख स्वरूपात पैसे जवळ बाळगत नाहीत; त्यामुळे चलन करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना एटीएमची शोधशोध करावी लागते. सांगली, साताºयाहून आलेले पालक, विद्यार्थ्यांना त्याचा अधिक त्रास होत असल्याचे काही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.