शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

स्टंटबाजीवर निवडून येणाऱ्यांमुळे लोकशाहीला धोका : शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:33 IST

चार वर्षे ज्यांचा पत्ता नसतो, ती मंडळी केवळ स्टंटबाजी करून निवडून येतात. काम न करता त्यांना जनता निवडून देते, ही बाबच लोकशाहीला घातक आहे, अशी टीका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.

ठळक मुद्देस्टंटबाजीवर निवडून येणाऱ्यांमुळे लोकशाहीला धोका : शिवतारेकाम न करता लोक खासदार होतात, हेच विशेष...

सातारा : चार वर्षे ज्यांचा पत्ता नसतो, ती मंडळी केवळ स्टंटबाजी करून निवडून येतात. काम न करता त्यांना जनता निवडून देते, ही बाबच लोकशाहीला घातक आहे, अशी टीका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. सातारा व बारामती लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवतारे म्हणाले, शरद पवार यांचा विचार जनतेने नाकारल्याचे लोकसभा निकालावरून स्पष्ट होते. काही लोक काम न करता व चार वर्षे मतदार संघात न फिरताही त्यांना लोक निवडून देतात.

साताऱ्याचे खासदार सव्वा लाख मतांनी निवडून आले आहेत. सव्वालाख लोकांचा हा जनादेश आहे. शेवटी जनता मालक आहे. त्यांना वाटतं चालतंय, त्यात कोण काय करू शकतं? तरीही शिवसेनेच्या उमेदवाराने साडेचार लाख मते मिळवली आहेत, हे लक्षात घेण्याजोगे आहे.पुरंदर विधानसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना चार हजारांचे मताधिक्य मिळाल्याबाबत छेडले असता पालकमंत्री म्हणाले, भावनिक साद घालून काही लोक मते मागतात. सुळे यांना केवळ चार हजारांचे मताधिक्क्य मिळाले आहे. पुढच्या विधानसभेला चित्र उलटे दिसेल.गोविंदा...नाच्या असून निवडून येतोराम नाईक यांच्यासारखे समर्पित वृत्तीने काम करणारे नेते लोकसभा निवडणुकीत नाच्या असणऱ्या गोविंदाकडून पराभूत झाले होते. गोविंदाच्या विजयामुळं समाजाचं किती नुकसान झालं. हे सर्वांनाच माहिती आहे, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर