शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

केंजळ गावातील अपघाताची मालिका रोखण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

वेळे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर गावापासून वाईकडे जाताना केंजळ हे पहिले गाव लागते. या गावाजवळ असलेले उलट्या ‘एस’ ...

वेळे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर गावापासून वाईकडे जाताना केंजळ हे पहिले गाव लागते. या गावाजवळ असलेले उलट्या ‘एस’ आकारातील वळण धोकादायक ठरत आहे. याठिकाणी अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. ती रोखण्याबाबत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. यामध्ये वाहनांसाठी वेगमर्यादा ठरवून देण्याची मागणी करण्यात आली.

या गावातील लोकांना इतर ठिकाणी व वाई तालुक्यात कामानिमित जाण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक व अन्य कामासाठी वाई, सातारा व पुणे येथे जाण्यासाठी राज्यमार्ग ११९ वर केंजळ येथील थांब्यावर यावे लागते. तेथूनच पुढे या गावच्या लोकांना जावे लागते. केंजळ फाट्यापासून वाईकडे जात असताना केंजळ गावानजीक उलट्या ‘एस’ आकाराचे वळण आहे. हे वळण खंडाळा घाटातील ‘एस’ कॉर्नरसारखेच घातक ठरत आहे. या वळणावरून येणारी वाहने रस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्यांना दिसत नाहीत. यामुळे अपघात होऊन केंजळ ग्रामस्थांना नाहक अपंगत्व व प्रसंगी स्वतःचा जीवही गमवावा लागत आहे.

या परिस्थितीमुळे या ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. केंजळ येथील भरधाव वेगातील वाहतुकीवर काहीतरी पर्याय काढून केंजळ ग्रामस्थांची होत असलेली हानी टाळण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केंजळ फाटा येथे वाई सुरूर रस्त्यावर येताना-जाताना असंख्य विद्यार्थी, ग्रामस्थ व महिलांना रस्ता ओलांडत असताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यमार्ग ११९ हा पाचगणी-महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना, तसेच मांढरदेव देवस्थानला जाणारा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावरून पुणे-मुंबई येथून येजा करणारे कारचालक भरधाव वेगाने आपली वाहने चालवितात. पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. वाहणे भरधाव असल्याने कित्येक वेळा प्रवाशांना रस्ता ओलांडताना थांबावे लागते, तर कित्येक जण रस्ता ओलांडताना येत असलेल्या वाहनांच्या वेगाचा अंदाज न आल्याने जखमी झाले आहेत. केंजळ फाटा येथे योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात असे निवेदन वाई पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, केंजळचे सरपंच मिलन गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, ग्रामपंचायत सदस्य नीलेश जगताप व सामाजिक कार्यकर्ते जयंत येवले यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिले आहे.