शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

केंजळ गावातील अपघाताची मालिका रोखण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

वेळे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर गावापासून वाईकडे जाताना केंजळ हे पहिले गाव लागते. या गावाजवळ असलेले उलट्या ‘एस’ ...

वेळे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर गावापासून वाईकडे जाताना केंजळ हे पहिले गाव लागते. या गावाजवळ असलेले उलट्या ‘एस’ आकारातील वळण धोकादायक ठरत आहे. याठिकाणी अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. ती रोखण्याबाबत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. यामध्ये वाहनांसाठी वेगमर्यादा ठरवून देण्याची मागणी करण्यात आली.

या गावातील लोकांना इतर ठिकाणी व वाई तालुक्यात कामानिमित जाण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक व अन्य कामासाठी वाई, सातारा व पुणे येथे जाण्यासाठी राज्यमार्ग ११९ वर केंजळ येथील थांब्यावर यावे लागते. तेथूनच पुढे या गावच्या लोकांना जावे लागते. केंजळ फाट्यापासून वाईकडे जात असताना केंजळ गावानजीक उलट्या ‘एस’ आकाराचे वळण आहे. हे वळण खंडाळा घाटातील ‘एस’ कॉर्नरसारखेच घातक ठरत आहे. या वळणावरून येणारी वाहने रस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्यांना दिसत नाहीत. यामुळे अपघात होऊन केंजळ ग्रामस्थांना नाहक अपंगत्व व प्रसंगी स्वतःचा जीवही गमवावा लागत आहे.

या परिस्थितीमुळे या ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. केंजळ येथील भरधाव वेगातील वाहतुकीवर काहीतरी पर्याय काढून केंजळ ग्रामस्थांची होत असलेली हानी टाळण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केंजळ फाटा येथे वाई सुरूर रस्त्यावर येताना-जाताना असंख्य विद्यार्थी, ग्रामस्थ व महिलांना रस्ता ओलांडत असताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यमार्ग ११९ हा पाचगणी-महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना, तसेच मांढरदेव देवस्थानला जाणारा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावरून पुणे-मुंबई येथून येजा करणारे कारचालक भरधाव वेगाने आपली वाहने चालवितात. पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. वाहणे भरधाव असल्याने कित्येक वेळा प्रवाशांना रस्ता ओलांडताना थांबावे लागते, तर कित्येक जण रस्ता ओलांडताना येत असलेल्या वाहनांच्या वेगाचा अंदाज न आल्याने जखमी झाले आहेत. केंजळ फाटा येथे योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात असे निवेदन वाई पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, केंजळचे सरपंच मिलन गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, ग्रामपंचायत सदस्य नीलेश जगताप व सामाजिक कार्यकर्ते जयंत येवले यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिले आहे.