शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कोसळत्या पावसात धनगर समाज रस्त्यावर आरक्षणाची मागणी : अनुसूचित जमातीनुसार सवलती देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:24 IST

धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सातारा : धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोसळत्या पावसातही धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी भिजत रस्त्यावर बसून राहिले.

‘एक धनगर, कोट धनगर’च्या गगनभेदी घोषणा देत धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आरक्षणासंदर्भात सरकारवर हल्लाबोल करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. येथील सैनिक स्कूल मैदानापासून सुमारास धनगर समाजबांधवांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये पारंपरिक वेशात धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. याप्रसंगी समाजबांधवांच्या वतीने मनोगतेही व्यक्त करण्यात आली.

धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप समाजबांधवांनी मनोगत व्यक्त करताना केला. या राज्यकर्त्यांवर आता विश्वास राहिला नाही, अशी भावना धनगर समाजबांधवांमधून व्यक्त होत होती. ‘येळकोट येळकोट जय मल्हार, उठ धनगरा जागा हो.. आरक्षणाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कुणाच्या बापाचं, एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे, एक धनगर कोट धनगर, कोण म्हणतंय देत नायं.. घेतल्याशिवाय राहत नाही,’ अशा गगनभेदी घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला होता. कपाळी भंडारा आणि हातात झेंडे घेतलेल्या महिला व युवकांची मोर्चात लक्षणीय गर्दी होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर समाजबांधव येऊन थांबले. ‘ना नेता, ना पक्ष आता धनगर दक्ष’, धनगड दाखवा नाहीतर शिफारस पाठवा,’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांच्या कपाळावर पिवळा भंडारा लावलेला होता, अनेकजण खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन आले होते. या आंदोलनामुळे सातारा कोरेगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. यावेळी सात मुलींनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्याचे आश्वासन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. बारामतीमध्ये मोर्चा काढला तेव्हा ‘आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. धनगर समाजाच्या जीवावर जशी सत्ता मिळविता येते, हे राज्यकर्त्यांना माहीत आहे; पण तशाच पद्धतीने आम्ही ती ओढून घ्यायला कमी पडणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. राजू गोरे, माजी नगरसेवक अशोक शेडगे, हणमंत चवरे, जगन्नाथ जानकर आदींच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.खरं सांगा पुढाºयांनो वचनं तुम्ही पाळली किती?राज्यकर्त्यांनी गेल्या ७० वर्षांच्या काळात धनगर समाजाची फसवणूकच केली. अनेकदा आश्वासने देण्यात आली; पण ती पाळली नाहीत. त्यामुळे खरं सांगा पुढाºयांनो वचनं तुम्ही पाळली किती?, असा उद्विग्न सवालही यावेळी विचारण्यात आला.तंटा समितीचं काही देणं-घेणं नाहीराज्य शासनाने तंटा समिती नेमल्याचे सांगण्यात येते. मात्र त्या समितीशी आम्हाला काही देणं-घेणं नाही. समाजाच्या हक्काचं आरक्षण सर्वांना मान्य अहे. ते शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

धनगर या समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र ‘धनगड’ या शब्दामुळे या संपूर्ण समाजाची फसवणूक करण्यात आली. आदिवासी लोकांचे २५ आमदार निवडून येतात, आम्हाला तेच आरक्षण दिलं असतं तर आमचेही लोक संसदेत गेले असते. या समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण तत्काळ जाहीर करावं, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.- टी. आर. गारळे, निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंपMorchaमोर्चा