शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

शेतकऱ्यांसाठी ‘रिपाइं’चे भीक मांगो आंदोलन

By admin | Updated: November 24, 2015 00:26 IST

कुसुंबी-कोळघर रस्ता बेकायदा उत्खननप्रकरणी ठेकेदारावर फौजदारीची मागणी

कुडाळ : कुसुंबी-कोळघर रस्त्याच्या बेकायदेशीर झालेल्या उत्खननाबद्दल ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी जावळी तालुका रिपाइंच्या वतीने सोमवारी मेढ्याच्या आठवडा बाजारात भीक मांगो आंदोलन केले. भीक तहसीलदार रणजित देसाई यांच्या टेबलावरच ठेवल्याने गोंधळ उडाला. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिकचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय गाडे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो भीमसैनिक व बाधित शेतकऱ्यांनी आज तहसीलदारांसाठी बाजारात भीक मागितली. या आगळ्या-वेगळ्या आंदोलनाने मात्र बाजारकरांची चांगलीच करमणूक झाली.कुसुंबी-कोळघर रस्त्याच्या रुंदीपेक्षा केवळ पवनचक्क्यांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आले आहे. त्यात ठेकेदार, पवनचक्की मालक व अधिकाऱ्यांच्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप संजय गाडे यांनी यावेळी बोलताना केला. गाडे म्हणाले, ‘१४७ शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यामध्ये गेल्या असून, त्यातील ४७ शेतकरी नवबौद्ध आहेत. मूळ ठेकेदार व मालकांनी या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान केले असून, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा गाडे यांनी तहसीलदारांसमोरच दिला. वेळ पडल्याच तहसीलदारांसमोर आत्मदहनही केले जाईल.’ तासभर चर्चा होऊनही ठोस निर्णय झाला नाही. तहसीलदार देसाई यांनी शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. (प्रतिनिधी)तहसीलदारांच्या टेबलावर भिकेचे पैसे आरपीआयचे कार्यकर्ते घोषणा देत बाजारात भीक मागत मागत तहसील कार्यालयात आले. तहसीलदारांनी त्यांना चर्चेसाठी आत बोलावल्यावर संजय गाडे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगून टोपलीत मिळालेली भीक तहसीलदारांच्या टेबलावरच ठेवली. तेव्हा तहसीलदार रणजित देसाई अवाक्च झाले. पोलीस पोलीस करत त्यांनी हे काय आहे, असं म्हटल्यावर पोलिसांनी पळत येऊन त्या टोपल्या गायब केल्या.