शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

उंबरी-धावली रस्ता खचल्याने ठेकेदाराच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

सातारा : उंबरी-धावली या रस्त्याचे काम २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले आहे. त्याचे निकृष्ट काम झाल्याने ...

सातारा : उंबरी-धावली या रस्त्याचे काम २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले आहे. त्याचे निकृष्ट काम झाल्याने यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्याला चरे पडले असून हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी उंबरी ग्रामस्थांनी पाचगणी पोलीस ठाण्यात केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाबळेश्वर तालुक्यातील उंबरी हे डोंगरकुशीत वसलेले गाव आहे. या गावाला जाण्यासाठी डोंगरातून एकच रस्ता आहे. या रस्त्याचे काम २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले होते परंतु हे काम अद्यापही अपूर्ण आहे. यादरम्यान संबंधित ठेकेदाराने मोठ्या अवजड साहित्याची वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा वापर करण्यात आला. वास्तविक हा रस्ता अवजड वाहतुकीस योग्य नव्हता. त्यामुळे रस्ता पूर्णपणे उताराच्या बाजूस खचला आहे. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. पूर्ण नादुरुस्त झाला आहे. डोंगरातून आलेले पाणी रस्त्यावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा.

निवेदनावर विनोद उंबरकर, रुपेश उंबरकर, बाबाजी उंबरकर, संतोष उंबरकर, संजय उंबरकर, आनंदा उंबरकर, विशाल दिसते यांच्या सह्या आहेत.

फोटो

उंबरी- धावली रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.