शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

उंबरी-धावली रस्ता खचल्याने ठेकेदाराच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

सातारा : उंबरी-धावली या रस्त्याचे काम २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले आहे. त्याचे निकृष्ट काम झाल्याने ...

सातारा : उंबरी-धावली या रस्त्याचे काम २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले आहे. त्याचे निकृष्ट काम झाल्याने यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्याला चरे पडले असून हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी उंबरी ग्रामस्थांनी पाचगणी पोलीस ठाण्यात केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाबळेश्वर तालुक्यातील उंबरी हे डोंगरकुशीत वसलेले गाव आहे. या गावाला जाण्यासाठी डोंगरातून एकच रस्ता आहे. या रस्त्याचे काम २०१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले होते परंतु हे काम अद्यापही अपूर्ण आहे. यादरम्यान संबंधित ठेकेदाराने मोठ्या अवजड साहित्याची वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा वापर करण्यात आला. वास्तविक हा रस्ता अवजड वाहतुकीस योग्य नव्हता. त्यामुळे रस्ता पूर्णपणे उताराच्या बाजूस खचला आहे. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. पूर्ण नादुरुस्त झाला आहे. डोंगरातून आलेले पाणी रस्त्यावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा.

निवेदनावर विनोद उंबरकर, रुपेश उंबरकर, बाबाजी उंबरकर, संतोष उंबरकर, संजय उंबरकर, आनंदा उंबरकर, विशाल दिसते यांच्या सह्या आहेत.

फोटो

उंबरी- धावली रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.