शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

'टाळूवरचं लोणी' खाण्याचाच प्रकार; मृताचा चेहरा दाखवण्यासाठी मागितले जातात ५०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 13:20 IST

Coronavirus in Satara: जम्बोमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवस प्रकृती चांगली राहते. त्यामुळे नातेवाईकही निश्चिंत होतात. पण, एके दिवशी रुग्ण अत्यवस्थ असल्याचा आणि त्यानंतर दगावल्याचा फोन येतो आणि नातेवाईकांची हतबलता सुरु होते.

- दीपक शिंदे, सातारा

जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार होतात. रुग्णांची व्यवस्थाही चांगली होते. पण, एकदा जम्बो सेंटरमध्ये रुग्ण गेल्यानंतर किमान दोन दिवस त्याबाबतची माहितीच कळत नाही. अनेकांना तर आपला रुग्ण दगावल्याचीच माहिती मिळते. त्यामुळे रुग्णाचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी अनेकजण जम्बोच्या बाहेर थांबून राहतात. त्यांना मृताचा चेहरा दाखविण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी २०० ते ५०० रुपयांची मागणी केली जाते. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्या सारखाच हा दुर्देवी प्रकार आहे.

कोरोना बाधित झाल्यानंतर अनेक रुग्ण घरीच उपचार घेतात. श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली की मग रुग्णालयामध्ये जाण्याचे नियोजन केले जाते. ऑक्सिजन लेव्हल ७० पेक्षा कमी असेल तर अनेक रुग्णालये केवळ जम्बो सेंटरचेच नाव सुचवितात. त्यामुळे जम्बोवरही ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करुन घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. तरीही अनेकांच्या दबावामुळे रुग्णांना दाखल करुन घेतले जाते. पुढे त्यांना ऑक्सिजन लावला जातो की व्हेंटिलेटर हे जम्बोमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाच माहित. मात्र, दोन दिवसांनंतर रुग्णाची सर्व माहिती नातेवाईकांना दिली जाते.

जम्बोमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर तीन ते चार दिवस प्रकृती चांगली राहते. त्यामुळे नातेवाईकही निश्चिंत होतात. पण, एके दिवशी रुग्ण अत्यवस्थ असल्याचा आणि त्यानंतर दगावल्याचा फोन येतो आणि नातेवाईकांची हतबलता सुरु होते. रुग्णाला दाखल केल्यानंतर मागील चार पाच दिवसात डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारावरच त्यांनी समाधान मानलेले असते. त्यामुळे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईक आणि घरातील पत्नी, आई, मुले यांचा जीव कासावीस होत असतो. काही करुन त्यांना अंतिम दर्शन घडवायचे असते. खासगी रुग्णालयांमध्ये ते शक्य होते. पण, जम्बोमध्ये सरकारी नियम असल्यामुळे रुग्णांना कोविड बाधित मृताच्या जवळपास येऊ दिले जात नाही. याचा फायदा काही महाभाग घेऊ लागले आहेत. जम्बोमधून रुग्ण बाहेर काढून नगरपालिकेच्या ताब्यात देताना त्यांचा चेहरा बघण्यासाठी चक्क पैशांची मागणी होऊ लागली आहे. समोरची व्यक्ती पाहून २०० किंवा ५०० रुपयांची मागणी केली जात आहे. अशावेळी नातेवाईकही हतबल असतात. कुठे वाद घालायचा, सध्या परिस्थिती काय आहे याचा विचार करुन पैसे देण्यासाठी मागे पुढे पाहिले जात नाही. पण, असा होणारा प्रकार लाजिरवाणा आणि कर्मचाऱ्यांकडून माणुसकीला काळीमा फासणाराच आहे.

दररोज असते ५० हून अधिक जणांची यादी

जम्बो कोविडमध्ये आणि जवळपास मृत झालेल्या सर्वांना जम्बोमध्ये आणले जाते. त्याठिकाणाहून त्यांना नगरपालिकेच्या ताब्यात दिले जाते. दररोज मृत झालेल्या किमान ५० किंवा त्याहून अधिक लोकांची यादी येथील कर्मचाऱ्यांकडे असते. त्यामुळे प्रत्येकाकडून किमान ५०० रुपये घेतले तर एका दिवसात २५ हजारांची कमाई होते. पण, हा होणार प्रकार तिरस्कार आणि चीड आणणारा आहे.

नातेवाईकांच्या असहाय्यतेचा घेतला जातोय गैरफायदा

घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे मृत झाला असल्यास ते कुंटुंब अगोदरच खूप खचून गेलेले असते. अशावेळी अखेरच्या दर्शनासाठी घरातील लोक आग्रह करतात आणि मग सुरु होते फोनाफोनी. कुठेतरी वशिला लावण्याचा प्रयत्न होतो आणि मग व्यवस्था करतो म्हणून सांगितले जाते. याच कुटुंबाच्या असहाय्य आणि अगतिकतेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

.........

जम्बो कोविड सेंटर बाहेर नगरपालिकेकडे बॉडी ताब्यात देताना अंतिम दर्शन केले जाते. याबाबत जम्बो हॉस्पिटल परिसरातच माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही प्रयत्न केले आणि आम्हाला अंत्यदर्शन घेता आले. एका व्यक्तीने प्लास्टिकच्या बँगमध्ये लपेटलेल्या शरीराच्या चेहऱ्याकडील चैन उघडली आणि चेहरा दाखविला. दुसऱ्याने मोबाईलने फोटो काढण्यास सांगितले. त्यानंतर बाजूला घेऊन पैशांची मागणी केली गेली. त्यावेळी अंत्यदर्शन होणे महत्वाचे असल्यामुळे आम्ही पैसे दिले आणि तिथून बाहेर पडलो. असे एका नातेवाईकाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस