शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

निबंर्धांमुळे सातारा जिल्हा बँकेला ६ कोटींचा तोटा

By admin | Updated: June 21, 2017 18:46 IST

कोंडी फुटली : ३९९ कोटींच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारणार

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २१ : शासनाच्या निबंर्धामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना दिली. दरम्यान, जिल्हा बँकेत नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या ३९९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २0१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या नोटा बँका आणि पोस्ट आॅफिसमध्ये जमा करण्यासाठी ३0 डिसेंबर २0१६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ग्राहकांनी नोटा जमा केल्या असल्या तरी बँकांकडे नोटा पडून आहेत. त्यामुळे बँकांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पोस्ट आॅफिसमध्ये पडून असलेल्या जुन्या ५00, १000 च्या नोटा रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया स्वीकारणार आहे. अर्थ मंत्रायलाने याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. मागील आठवड्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी मागणी केली होती आणि शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनीही सदर विषय लाउन धरला होता.८ नोव्हेंबर २0१६ रोजी चलनातून ५00 आणि १000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर ३0 डिसेंबर २0१६ पर्यंत बँकांमध्ये आणि पोस्ट आॅफिसमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील, असं अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

जिल्हा बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज देणेही बँकांना कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानता येईल. रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरुपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

३९९ कोटींवरील व्याजाचे काय?

जिल्हा मध्यवर्ती बँकांवर जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत निर्बंध घातले गेले. मात्र त्याआधी बँकेच्या खातेदारांकडून बँकेमध्ये ३९९ कोटी रुपये जमा केले होते. यावर होणार व्याज बँकेनेच सोसले. हे व्याज रिझर्व्ह बँक देणार का? याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेची झाली होती कोंडी

एकीकडे रद्द नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारत नाही, दुसरीकडे ठेवीदारांना व्याज तर द्यावं लागतं, अशी बँकांची अडचण झाली होती. नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पुढचे तीस दिवस ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहे.

 

या आल्या अडचणी

 

- कर्ज पुरवठ्यावर मयार्दा- दैनंदिन कॅश व्यवहार मंदावले- जिल्हा बँकांची एटीएम सुविधा बंद- सर्वच व्यवहारांवर शिथिलता आली- बँकेत जमा असणाऱ्या रकमेवर व्याज द्यावे लागले