शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

माझे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय चुकीचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST

कऱ्हाड : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी १९२९ सालापासून सातारमध्ये कार्यरत आहे. मी त्या पतपेढीचा विद्यमान संचालक ...

कऱ्हाड : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी १९२९ सालापासून सातारमध्ये कार्यरत आहे. मी त्या पतपेढीचा विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष आहे. मात्र, कोरोनाच्या काळात घेतलेल्या मासिक सभेला नसल्याचे कारण देत उपस्थित विद्यमान संचालकांनी माझे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून, त्यांच्या मनमानी कारभाराचा हा उत्तम नमुना आहे. याविरोधात योग्य त्याठिकाणी न्याय मागणार असल्याचे मत पतपेढीचे संचालक राहुल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल वर्षभरापूर्वीच संपलेला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ दिलेली आहे. दरम्यान, संस्थेच्या एकूण १५ संचालकांपैकी सध्या पाच संचालक पदे रिक्त आहेत. यापैकी एका संचालकांचा मृत्यू झाला आहे तर दोन संचालकांनी सेवानिवृत्तीमुळे राजीनामे दिले आहेत. इतर दोन संचालकांनी स्वच्छेने राजीनामे दिले आहेत. त्यामुळे सध्या संस्थेचा कारभार दहा संचालकांवर व अध्यक्षांविना सुरू आहे.

वास्तविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सहकारी संस्थांच्या मासिक व वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. तशाच पद्धतीने आमच्या संस्थेची सभा आयोजित करावी, असे मी वारंवार तोंडी व भ्रमणध्वनीवरून संस्थेचे उपाध्यक्ष यांना सांगितले होते. मी कऱ्हाड कोषागार कार्यालयात कार्यरत आहे. जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. अशावेळी मला कऱ्हाड ते सातारा प्रवास करून मासिक सभेला हजर राहणे शक्य नव्हते. याचा विचार न करता संबंधितांनी यातील दोन सभा सायंकाळी सहानंतर प्रत्यक्ष आयोजित केल्या होत्या. कोरोनाच्या काळात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन गर्दी करायची नाही तसेच वाहने उपलब्ध नाहीत त्यामुळे मी मासिक सभांना हजर राहिलो नाही. सलग तीन मासिक सभांना हजर नसल्याचे कारण देत त्यांनी मला तिसऱ्या सभेनंतर कोरम पूर्ण नसताना संचालकपद रद्द केल्याचे पत्र पाठवले आहे. ही बाब पूर्णपणे चुकीची आहे.

त्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे. संस्थेला गेले पाच महिने अध्यक्ष नसताना त्यांच्या शिक्क्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. चेअरमन यांच्या सहीने मला पत्र पाठवले आहे. वास्तविक माझे संचालकपद रद्द करण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे का? असेल तर त्यांनी प्रथमत: मला तुमचे संचालकपद रद्द का? करू नये? अशी नोटीस देणे आवश्यक होते. म्हणजे मला माझी बाजू मांडता आली असती. नाहीतर तसा ठराव जिल्हा निबंधक, सातारा यांच्याकडे पाठवणे आवश्यक होते. त्यावर निबंधकांनी योग्य तो निर्णय घेतला असता. मात्र, असे न करता त्यांनी मला थेट तुमचे संचालकपद रद्द केले आहे, असे पत्र पाठवले आहे. माझे संचालकपद रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याबाबत योग्य त्याठिकाणी न्याय मागणार असल्याचेही जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.