शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

माझे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय चुकीचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST

कऱ्हाड : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी १९२९ सालापासून सातारमध्ये कार्यरत आहे. मी त्या पतपेढीचा विद्यमान संचालक ...

कऱ्हाड : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी १९२९ सालापासून सातारमध्ये कार्यरत आहे. मी त्या पतपेढीचा विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष आहे. मात्र, कोरोनाच्या काळात घेतलेल्या मासिक सभेला नसल्याचे कारण देत उपस्थित विद्यमान संचालकांनी माझे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून, त्यांच्या मनमानी कारभाराचा हा उत्तम नमुना आहे. याविरोधात योग्य त्याठिकाणी न्याय मागणार असल्याचे मत पतपेढीचे संचालक राहुल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल वर्षभरापूर्वीच संपलेला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ दिलेली आहे. दरम्यान, संस्थेच्या एकूण १५ संचालकांपैकी सध्या पाच संचालक पदे रिक्त आहेत. यापैकी एका संचालकांचा मृत्यू झाला आहे तर दोन संचालकांनी सेवानिवृत्तीमुळे राजीनामे दिले आहेत. इतर दोन संचालकांनी स्वच्छेने राजीनामे दिले आहेत. त्यामुळे सध्या संस्थेचा कारभार दहा संचालकांवर व अध्यक्षांविना सुरू आहे.

वास्तविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सहकारी संस्थांच्या मासिक व वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. तशाच पद्धतीने आमच्या संस्थेची सभा आयोजित करावी, असे मी वारंवार तोंडी व भ्रमणध्वनीवरून संस्थेचे उपाध्यक्ष यांना सांगितले होते. मी कऱ्हाड कोषागार कार्यालयात कार्यरत आहे. जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. अशावेळी मला कऱ्हाड ते सातारा प्रवास करून मासिक सभेला हजर राहणे शक्य नव्हते. याचा विचार न करता संबंधितांनी यातील दोन सभा सायंकाळी सहानंतर प्रत्यक्ष आयोजित केल्या होत्या. कोरोनाच्या काळात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन गर्दी करायची नाही तसेच वाहने उपलब्ध नाहीत त्यामुळे मी मासिक सभांना हजर राहिलो नाही. सलग तीन मासिक सभांना हजर नसल्याचे कारण देत त्यांनी मला तिसऱ्या सभेनंतर कोरम पूर्ण नसताना संचालकपद रद्द केल्याचे पत्र पाठवले आहे. ही बाब पूर्णपणे चुकीची आहे.

त्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे. संस्थेला गेले पाच महिने अध्यक्ष नसताना त्यांच्या शिक्क्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. चेअरमन यांच्या सहीने मला पत्र पाठवले आहे. वास्तविक माझे संचालकपद रद्द करण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे का? असेल तर त्यांनी प्रथमत: मला तुमचे संचालकपद रद्द का? करू नये? अशी नोटीस देणे आवश्यक होते. म्हणजे मला माझी बाजू मांडता आली असती. नाहीतर तसा ठराव जिल्हा निबंधक, सातारा यांच्याकडे पाठवणे आवश्यक होते. त्यावर निबंधकांनी योग्य तो निर्णय घेतला असता. मात्र, असे न करता त्यांनी मला थेट तुमचे संचालकपद रद्द केले आहे, असे पत्र पाठवले आहे. माझे संचालकपद रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याबाबत योग्य त्याठिकाणी न्याय मागणार असल्याचेही जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.