शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या कामात हजारो झाडांचे डेथ वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 22:40 IST

मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर या सुमारे १५० किलोमीटर अंतराच्या राज्यमार्गाचे पहिल्या टप्प्यातील महूद ते मायणी या सुमारे ६० किलोमीटरच्या राज्यमार्गाच्या ...

मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर या सुमारे १५० किलोमीटर अंतराच्या राज्यमार्गाचे पहिल्या टप्प्यातील महूद ते मायणी या सुमारे ६० किलोमीटरच्या राज्यमार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, यामुळे मार्गालगत असणाऱ्या हजारो झाडांची कत्तल होणार आहे.गेली अनेक वर्षे विविध कारणांमुळे रखडत असलेला मल्हारपेठ-पंढरपूर हा शिवकालीन राज्यमार्ग कधी चौपदरीकरण होणार, याची प्रतीक्षा वाहनचालक या मार्गालगत राहत असलेल्या ग्रामस्थांना लागली होती, ही प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे.मल्हारपेठ-पंढरपूर या सुमारे १५० किलोमीटरच्या अंतरामधील मायणी, ता. खटाव ते महूद, ता. सांगोलादरम्यानच्या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम महूद येथून सहरू झाले आहे. संबंधित ठेकेदारांकडून या मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या अंतराची मोजणी पूर्ण करून तशा प्रकारच्या खुणाही राज्यमार्गावर केल्या आहेत.या कामादरम्यान महूद ते मायणी या अंतरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान असलेल्या झाडांवर नंबर लिहून झाडांची गणना नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे या कामादरम्यान किती झाडांची कत्तल होणार, हे निश्चित झाले आहे. हा आकडा हजाराच्या घरात केला आहे.मल्हारपेठ ते पंढरपूर हा राज्यमार्ग दुष्काळी पट्ट्यातून जात आहे. या भागात झाडांचे प्रमाण ही अल्प आहे. असणारी झाडे ही वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना व ऊन, वारा सहन करून उभी राहिलेली आहे. त्यामुळे शासनाने संबंधितांकडून या मार्गावर नव्याने वृक्षारोपण आतापासून करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून मार्गाचे काम पूर्ण होताच मार्गावरील वृक्षही बहरलेले दिसतील.मायणीच्या बाजारपेठेवर संक्रांतमल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर सुमारे एक किलोमीटर मायणीची मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून गत आठवड्यामध्ये रस्त्याचा मध्यभागापासून दोन्ही बाजूंस सुमारे १७ फुटांची मोजणी करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंस असणाºया बाजारपेठेतील अनेक दुकान गाळ्यांना झळ पोहोचणार असल्यामुळे बाजारपेठवर काही काळासाठी संक्रांत येणार आहे.मार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठमल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर सुमारे एक किलोमीटर मायणीची बाजारपेठ आहे. ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याच बरोबर मसूर, ता. कºहाड, शेनवडी, ता. माण व उंब्रजमधूनही हा राज्यमार्ग जात असल्यामुळे या गावातील बाजारपेठेला कमी-अधिक फटका बसणार आहे.