शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

नांदगणेत मुस्लिम समाजाकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

कुडाळ : अतिवृष्टीमुळे जावळीतील केळघर भागातील गावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शेती, वीज, पाणी पुरवठा या साऱ्यांनाच याचा ...

कुडाळ : अतिवृष्टीमुळे जावळीतील केळघर भागातील गावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शेती, वीज, पाणी पुरवठा या साऱ्यांनाच याचा फटका सहन करावा लागला. यातच नांदगणे येथील पाणी पुरवठा योजना गाडली गेल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती. ग्रामस्थांची ही समस्या सोडविण्यासाठी खिदमत - ए - खल्क समिती व मुस्लिम समाजाने या गावाला पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

अतिवृष्टीमुळे नांदगणे गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. येथील पाणी योजना गाडली गेल्याने टंचाई जाणवत होती. याबाबत सातारा येथील सातारा मुस्लिम जमातीचे अमीरसाब अनिसभाई तांबोळी यांनी येथील लोकांची समस्या सोडविण्यासाठी आवश्यक साहित्य देण्याचे ठरवले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार खिदमत - ए - खल्क समिती व मेढा मुस्लिम समाजाच्यावतीने ६०० मीटर पाईप व पाणी साठविण्यासाठी टाकी देण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, विस्तार अधिकारी ए. पी. पवेकर, साजिदभाई शेख, सादिकभाई शेख, हाजी मोहसिन भाई बागवान, हाफिज मुराद, अज्जूभाई घड्याळवाले, आरिफ खान, तन्वीर शेख, इम्रान आतार, साजिद मुजावर, सत्तार पठाण, सादिक सय्यद, उपसरपंच जगन्नाथ दळवी, पोलीस पाटील विष्णू दळवी, अविनाश दळवी, श्रीरंग लोहार, महंमद पठाण, दत्ता लोहार, सतीश पार्टे, शांताराम दळवी, राजाराम दळवी आदी उपस्थित होते. संजय दळवी यांनी सूत्रसंचालन केले तर बापू उंबरकर यांनी आभार मानले.

२१ कुडाळ

फोटो - नांदगणे येथे खिदमत - ए - खल्क संस्थेच्यावतीने पाण्याची टाकी व पाईप सादिकभाई शेख यांनी दिले. यावेळी सतीश बुद्धे, साजिद शेख, हाजी मोहसिनभाई बागवान, हाफिज मुराद आदी उपस्थित होते.